माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे निलंबन मागे

विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याने निलंबित करण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री श्री. राजेंद्र मुळक यांचे निलंबन आज औपचारिकरित्या मागे घेण्यात आले. दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खर्गे व महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी श्री. रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत हा निर्णय...

रेल्वे प्रवास १ जुलैपासून महागणार; लांब पल्ल्याच्या तिकीट दरात वाढ
मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांना एक झटका दिला आहे. १ जुलैपासून देशभरात मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या तिकीट दरात किरकोळ वाढ करण्यात आली आहे. जरी प्रती किलोमीटर वाढ फारशी मोठी नसली, तरी दीर्घ अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर याचा थेट परिणाम...

रविंद्र चव्हाण यांची भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती; पक्षाला मिळाले नवे नेतृत्व!

खापरखेडा व कोराडी येथील थर्मल ॲश कोणत्याही उद्योजकांसाठी मोफत उपलब्ध – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नागपूर,: कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पातून उपलब्ध होणारी कोळशाची राख ही खसारा, कोराडी, वारेगाव व नांदगाव येथील बंधाऱ्यात पोहचविली जाते. ही राख वीट उद्योगासह विविध ठिकाणच्या विविध भरावासाठी उत्तम पध्दतीने वापरता येते. या राखेला शासकीय पातळीवर कोणतेही मूल्य...
कपिलनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; देशी बनावटीच्या दोन अग्निशस्त्रांसह आरोपी अटकेत
नागपूर : कपिलनगर पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून कारवाई करत एका व्यक्तीला देशी बनावटीच्या दोन अग्निशस्त्रांसह अटक केली आहे. ही कारवाई ३० जून २०२५ रोजी रात्री ७.५० ते ११.१५ या वेळेत उप्पलवाडी परिसरातील सहारे ले-आऊटजवळील मोकळ्या जागेत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या...
हिंदी सक्तीविरोधातील लढ्याला यश… आता जल्लोष तुमचा;राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांचं मराठी जनतेला आवाहन
मुंबई :मराठी भाषेवर अन्याय करणाऱ्या त्रिभाषा धोरणाच्या विरोधात एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी आता लढ्याच्या विजयाचं जल्लोषात स्वागत करण्याचं आवाहन केलं आहे. येत्या ५ जुलै रोजी वरळी डोम येथे आयोजित विजयी मेळाव्याचं निमित्त साधून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त...
स्त्रियांनी शेतीकडे वळून कुटुंबाचे रक्षण करावे – सौ. कांचनताई गडकरी
नागपूर : ‘माता’ आणि ‘माती’ या दोनच गोष्टी नवनिर्मिती करू शकतात. चांगले बियाणे मातीत रुजवल्यास त्याचे फळही चांगले, सुसंस्कारीत आणि विषमुक्त मिळते. त्यामुळे कुटुंबाचा महत्वाचा घटक असलेल्या स्त्रियांनी कुटुंब सांभाळताना शेतीकडे वळावे व परसबागेत तयार झालेल्या विषमुक्त भाजांच्या माध्यमातून कुटुंबाचे...
काँग्रेस नेते नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित; अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचीही गोंधळात सुरुवात
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार गदारोळ झाला. काँग्रेसचे आमदार आणि माजी अध्यक्ष नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही कारवाई केली. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर चर्चेच्या वेळी नाना पटोले यांनी कृषिमंत्री...
नागपूरच्या रस्त्यांवर स्टंट करणारा व्यक्ती पोलिस नसून होमगार्ड;एसीपी माधुरी बाविस्कर यांची माहिती
नागपूर : वर्धमान नगर रस्त्यावर पोलीस गणवेशात एक व्यक्ती स्टंट करत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. हेल्मेट घातलेलं असलं तरी स्कूटीवर मागे वळून, हात जोडत, धोकादायकपणे वाहन चालवणं हे सगळं थेट वाहतूक नियमांचं उल्लंघन...
हिंदी सक्तीचा निर्णय राजकीय दबावामुळे रद्द केला नाही तर…; मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान
मुंबई : राज्य सरकारने त्रिभाषा धोरणात हिंदी सक्तीचा निर्णय अखेर मागे घेतला असून, हा निर्णय कुठल्याही राजकीय दबावामुळे नव्हे तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. “आम्ही कोणत्याही पक्षाच्या मतांपेक्षा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे कल्याण महत्त्वाचे मानतो....
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी हालचाली वेगात; ‘या’ नावावर शिक्कामोर्तब !
मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून, आजच सायंकाळपर्यंत नव्या अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे दाखल...
लाडक्या बहिणींना दिलासा; यंदा दोन हप्त्यांची रक्कम एकत्र मिळण्याची शक्यता
मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेतून राज्यातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचा थेट आर्थिक लाभ मिळतो. मात्र जून महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नसल्याने लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर आता दिलासादायक बातमी समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांकडून...
विधानसभेतील विरोधकांचा आवाज दुर्बल? सलग तिसऱ्या अधिवेशनातही विरोधी पक्षनेते पद रिक्त!
मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असले तरी विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मागील दोन अधिवेशनांप्रमाणेच हे अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याशिवाय पार पडण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे विधानसभेतील विरोधकांचा आवाज दबला जातोय का, असा सवाल निर्माण झाला...
शक्ती कायद्यावर सरकार गंभीर नाही;अनिल देशमुखांचा फडणवीस सरकारवर आरोप
नागपूर : महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ‘शक्ती कायदा’बाबत राज्य सरकार उदासीन असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. नागपूरमधील रविभवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशमुखांनी राज्य सरकारवर निशाणा साधत...
नागपूरमध्ये कृषी केंद्र चालकांचा सरकारविरोधात एल्गार;विविध मागण्यांवर आंदोलन
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र चालक आणि व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज संविधान चौकात तीव्र आंदोलन छेडलं. कृषी बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या विक्रीतील समस्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांची प्रमुख मागणी होती की, प्रतिबंधित आणि अनधिकृत एचटीबीटी...
AIMIM नागपुर जिल्हा अध्यक्ष सोहेल अहमद शिवसेना प्रवेश
आज नागपूर येथे शिवसेनेचे पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात व आमदार मा.क्षी कुपाल जी तुमाने. श्री किरणभाऊ पांडव सहासंपर्क प्रमुख अमित जी कातुरे यांच्या मार्गदर्शनात AIMIM नागपुर जिल्हा अध्यक्ष सोहेल अहमद ,...
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचे ‘मी मराठी’ टोपी घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज (३० जून) सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. शिवसेना (ठाकरे गट) आणि अन्य विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत वातावरण तापवलं. सकाळीच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार ‘मी मराठी’...
… हा तर मराठी माणसाचा विजय,५ जुलैला ‘विजयी मेळावा’ होणार; राज ठाकरे यांचे स्पष्टीकरण
मुंबई :मराठी भाषेवर लादल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीच्या विरोधात सुरू झालेल्या संघर्षात राज्य सरकारने अखेर माघार घेतली आहे. त्रिभाषा सूत्रावर आधारित शासकीय आदेश (जीआर) रद्द करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. या निर्णयानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे...
मराठी जनतेच्या दबावापुढे सरकारचा झुकाव; हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द
मुंबई : राज्य सरकारने शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयाला अखेर माघार घेतली आहे. यासंदर्भात जाहीर करण्यात आलेले दोन्ही शासन निर्णय (जीआर) रद्द करण्यात आले असून, त्रिभाषा सूत्र कुठल्या इयत्तेपासून लागू करायचे यावर निर्णय घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती...
ठाकरे बंधूंचा दबाव कामाला आला; सरकारची माघार ही मराठी विजयाची नांदी; संजय राऊतांचे विधान
मुंबई : हिंदी सक्तीविरोधातील लढ्याला मोठं यश मिळालं असून राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राबाबत घेतलेला निर्णय अखेर मागे घेतला आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांची एकजूट हीच सरकारसाठी मोठा धसका ठरली. "राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आणि अवघ्या १०...
आदिवासी बांधवांच्या विकासासाठी उपलब्ध निधीचे प्राधान्यक्रम ठरवा – आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक ऊईके
नागपूर: आदिवासी विकास विभागाकडून विविध विभागांना आदिवासींच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, संबंधित विभागाने हा निधी खर्च करताना त्याचा प्राधान्यक्रम व अधिकाधिक व्यक्तीविकास ठरविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी आज केले. सदर...