महाराष्ट्राच्या विकासाला स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून वेग; टाटा ट्रस्टसोबत १२ तर नाम फाउंडेशनसोबत करार!
मुंबई,: राज्याच्या सर्वांगीण प्रगतीला नवी चालना देत महाराष्ट्र सरकारने टाटा ट्रस्ट आणि नाम फाउंडेशनसोबत महत्त्वाचे सामंजस्य करार केले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या करार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या परिवर्तनासाठी स्वयंसेवी संस्थांची भागीदारी निर्णायक ठरणार असल्याचा ठाम विश्वास...
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नांदेड : मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात आज दुपारी भूकंपाचे हलके धक्के जाणवल्याची नोंद झाली आहे. मुखेड तालुक्यातील काही गावांमध्ये दुपारी सुमारे ३ वाजून १५ मिनिटांच्या दरम्यान जमिनीखालून गडगडाटासारखा आवाज ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यानंतर काही क्षण जमीन थरथरल्याचा अनुभव ग्रामस्थांनी व्यक्त...
एअर इंडिया अपघात; पायलटने मुद्दाम विमान पाडलं? इंधन स्विच जाणूनबुजून बंद केल्याचा धक्कादायक दावा
मुंबई : गेल्या वर्षी १२ जून २०२५ रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताबाबत इटालियन दैनिक *‘कोरीएरे डेला सेरा’*ने धक्कादायक दावा केला आहे. ही दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे नव्हे, तर “जाणूनबुजून केलेल्या कृतीचा परिणाम” असल्याचा निष्कर्ष तपासकर्त्यांनी काढल्याचे वृत्त नवी...
दादाच्या आशीर्वादानेच नातं ठरलं;रेवतीच्या लग्नाबाबत सुप्रिया सुळे यांची भावना
नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरी लवकरच लगीनघाई सुरू होणार आहे. त्यांची कन्या रेवती सुळे हिचा नागपूरचे सारंग लखानी यांच्याशी विवाह ठरल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी ही आनंदवार्ता समोर आली. रेवती आणि सारंग...
‘भाजप म्हणजे विषारी साप’; बच्चू कडूंचा जोरदार हल्लाबोल
नागपूर - बारामती येथे २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना लँडिंगपूर्वी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर विमानाचा स्फोट झाल्याचे सांगितले जाते. या...
कामगार संघटनांकडून देशव्यापी ‘भारत बंद’; केंद्राच्या धोरणांविरोधात राज्यभर आंदोलन
मुंबई : केंद्र सरकारच्या कामगार व शेतकरी धोरणांविरोधात विविध केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने आज देशव्यापी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. मुंबईसह राज्यभर मोर्चे, निदर्शने आणि आंदोलनांचे आयोजन करण्यात आले असून, मुंबईत वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर दुपारी तीन...
धक्कादायक! नागपुरात १५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; बारावीच्या विद्यार्थ्यासह तिघांना
नागपूर : शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत बारावीच्या विद्यार्थ्यासह तिन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी दोघे अल्पवयीन असून सर्वांवर पॉक्सो कायद्याअंतर्गत...
नागपूरहून मुंबई -पुणे मार्गावर विशेष ट्रेन सेवा; अकोला प्रवाशांसाठी मोठा दिलासा
नागपूर: नागपूरहून मुंबई आणि पुणेच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीला लक्षात घेत मध्य रेल्वेने विशेष ट्रेन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन सेवा शनिवारीपासून सुरू होणार असून, यामुळे अकोला आणि विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. या विशेष गाड्यांमध्ये...
झी २४ तासच्या ‘ऑपरेशन खैरात’ स्टिंगवर बावनकुळेंचा संताप; १०० कोटींच्या मानहानीचा इशारा
मुंबई : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी झी २४ तासच्या कथित ‘ऑपरेशन खैरात’ स्टिंगवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजता प्रसारित झालेल्या या स्टिंगमध्ये आपले व महसूल विभागाचे नाव विनाकारण ओढल्याचा आरोप करत त्यांनी या वृत्तवाहिनीवर कठोर...
एमएसईडीसीएलची धाड; नागपूरजवळील बेलोना गावात वीजचोरीचे सहा प्रकार उघड!
नागपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (एमएसईडीसीएल)ने नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील बेलोना गावात पहाटेच धडक कारवाई करत वीजचोरीचे सहा प्रकार उघडकीस आणले. मंगळवारी सकाळी सुमारे ६ वाजता करण्यात आलेल्या या अचानक तपासणी मोहिमेचा उद्देश प्रामाणिक ग्राहकांना सुरळीत व विश्वासार्ह...
विश्व कर्करोग दिनानिमित्त नागपुरात जनजागृतीचा संदेश; रक्तकर्करोगाविरोधात एकजूट होण्याचे आवाहन!
नागपूर : ४ फेब्रुवारी रोजी साजऱ्या करण्यात येणाऱ्या विश्व कर्करोग दिनानिमित्त नागपुरात रक्तकर्करोगाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी विशेष पत्रकार परिषद घेण्यात आली. कर्करोगाचे वाढते प्रमाण, वेळेत निदानाचे महत्त्व आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी या वेळी सविस्तर माहिती देण्यात आली. यावर्षी (२०२५-२०२७) विश्व कर्करोग दिनाची...
कामठीत ‘ऑपरेशन थंडर’अंतर्गत; एमडी ड्रग्ससह २३ वर्षीय तरुणाला अटक!
नागपूर : शहरात सुरू असलेल्या अमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत ‘ऑपरेशन थंडर – लेट्स युनाइट फॉर अ ड्रग-फ्री सोसायटी’ अंतर्गत न्यू कामठी पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) पावडरसह २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपीकडून अमली पदार्थांसह एकूण ७२ हजार...
नागपूरमध्ये यूट्यूब पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांविरोधात केले भ्रष्टाचाराचे खोटे आरोप
नागपूर : नागपूर पोलिसांवर टीका करत भ्रष्टाचाराचे आरोप केल्याप्रकरणी एका यूट्यूब पत्रकाराविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. विजय सीताराम खवसे असे संबंधित यूट्यूब पत्रकाराचे नाव असून जरीपटका पोलिस ठाण्यातील कर्मचारी तरण शर्मा यांनी याबाबत...
ओला-उबर-रॅपिडो उद्या देशभर बंद? कॅब चालकांचा ‘ऑल इंडिया ब्रेकडाउन’चा इशारा
नवी दिल्ली : उद्या (शनिवार, ७ फेब्रुवारी) ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अॅप-आधारित कॅब सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. देशभरातील चालकांनी एकदिवसीय संपाची घोषणा केली असून या आंदोलनाला “ऑल इंडिया ब्रेकडाउन” असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी प्रवास...
कामठीच्या किरण मेश्राम यांची ‘मन की बात’ प्रश्नमंजुषेत देशात टॉप ३० मध्ये निवड!
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाशी संबंधित प्रश्नमंजुषेत कामठी येथील सौ. किरणताई पुष्पराज मेश्राम यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या १० पैकी १० प्रश्नांची अचूक व जलद उत्तरे देत त्यांनी देशभरातील अव्वल...
जमीन महसूल कायद्यात दुरुस्ती;जमिनीसाठी स्वतंत्र ‘एनए’ परवानगीची गरज संपली, बावनकुळेंचा निर्णय
मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत महायुती सरकारने जमीन महसूल कायद्यात महत्त्वपूर्ण दुरुस्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बिगर कृषी (एनए) वापरासाठी स्वतंत्र परवानगी घेण्याची अट रद्द केली आहे. आता केवळ बांधकाम आराखड्याची मंजुरी मिळाली...
आम्हाला दोष देऊ नका, काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; चंद्रपूर महापौर निवडणुकीनंतर संजय राऊतांचा घणाघात
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत काँग्रेसला झालेल्या धक्कादायक पराभवानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. सर्वाधिक २७ नगरसेवक असूनही काँग्रेसला सत्ता मिळवता न आल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे. भाजपाच्या संगीता...
महाराष्ट्रात ७० हजार सरकारी पदांची भरती; तरुणांसाठी मोठी संधी
मुंबई : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने प्रशासनातील रिक्त जागा भरण्यासाठी तब्बल ७० हजार पदांची मोठी भरती मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आचारसंहिता संपताच ही प्रक्रिया गतीने राबवली...
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून; महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला होणार सादर
मुंबई : राज्याच्या राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानले जाणारे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. २३ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार असून, ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात येणार...
नागपुरात कोराडीतील १५ वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात शोककळा
नागपूर : कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. महादुला परिसरातील १५ वर्षीय विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू...
भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौर,सामान्य मुंबईकरांची स्वप्न पूर्ण करू;मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी अखेर भाजपच्या रितू तावडे विराजमान झाल्या आहेत. तर शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय घाडी यांनी उपमहापौर म्हणून पदभार स्वीकारला. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते आज दोघांनीही अधिकृतरित्या पदभार स्वीकारला. सभागृहात घोषणा...





