नागपूर विद्यापीठाला पहिली महिला कुलगुरू; डॉ. मनाली क्षीरसागर यांच्याकडे नेतृत्वाची धुरा
नागपूर — तब्बल दोन वर्षे कुलगुरू पद रिक्त राहिल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अखेर स्थायी नेतृत्व लाभले आहे. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच एका महिला शिक्षणतज्ज्ञाची कुलगुरूपदी नियुक्ती झाली असून, डॉ. मनाली मकरंद क्षीरसागर या RTMNU च्या २५व्या कुलगुरू बनल्या आहेत....
महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वेची विशेष तयारी; ४ ते ८ डिसेंबरदरम्यान धावणार विशेष गाड्या
मुंबई — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो अनुयायी मुंबईत दाखल होणार आहेत. संभाव्य गर्दीची पूर्वकल्पना घेऊन मध्य रेल्वेने मोठी तयारी पूर्ण केली असून, ४ ते ८ डिसेंबरदरम्यान एकूण १५ विशेष अनारक्षित लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच १२...
निकाल लांबणीवर…यावर न बोललेलंच चांगलं; उद्धव ठाकरे संतापले
मुंबई : महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांवर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट अढळले आहे. २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान पार पडले असले तरी निकालाची प्रतिक्षा आणखी वाढली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व निकाल 21 डिसेंबरपर्यंत जाहीर...
मतदानाआधीच निवडणुका स्थगित,आयोगाचा निर्णय कायद्याला धरून नाही; मुख्यमंत्री फडणवीस संतापले
छत्रपती संभाजीनगर - राज्य निवडणूक आयोगाने काही नगरपरिषदांच्या निवडणुका अचानक थांबवण्याच्या निर्णयामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही जणांनी न्यायालयात दाद मागितल्यानंतर आयोगाने हे पाऊल उचलले. मात्र, या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिक्रिया नोंदवली आहे. मुख्यमंत्री म्हणाले,हा निर्णय कायद्याला...
निवडणूक प्रक्रिया थांबवू नये; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र
मुंबई - महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून निवडणूक प्रक्रिया कोणत्याही प्रकारे पुढे ढकलू नये, अशी मागणी केली आहे. अलीकडील निर्णयांमुळे निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती त्वरित दूर करण्याची त्यांनी...
‘या’ 24 नगरपरिषद, नगरपंचायतींचं मतदान पुढे ढकललं; जाहीर सुट्टीही रद्द
मुंबई - राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठ्या बदलाला सुरुवात झाली असून 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी काही ठिकाणी दिलेली सार्वजनिक सुट्टी मागे घेण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशावर दाखल झालेल्या अपीलांचा निकाल 23 नोव्हेंबरनंतर लागल्यामुळे या मतदारसंघांमध्ये...
नगरपालिका-नगरपरिषद निवडणुकांवर हायकोर्टाचा मोठा दणका; उद्याची मतमोजणी स्थगित
महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसंदर्भात मोठा बदल समोर आला आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या महत्वाच्या आदेशानुसार उद्या होणारी मतमोजणी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या निकाल जाहीर होणार नसून आता निकाल 21 डिसेंबर रोजी घोषित केले जातील. निवडणुकांशी संबंधित दाखल झालेल्या याचिकांवर...
नगरपरिषद निवडणुका : मतदानाला सुरुवात होताच EVM बंद पडल्याने प्रशासन अडचणीत
मुंबई - महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी आज सकाळी मतदानास सुरुवात झाली. सकाळी 7.30 वाजताच अनेक केंद्रांवर मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलिसांचा बंदोबस्त, निवडणूक कर्मचारी आणि यंत्रणा पूर्ण तयारीत असतानाच सुरुवातीच्या तासांमध्येच तांत्रिक बिघाडांनी...
खापरखेडा पिकनिक हल्ला प्रकरण; क्राईम ब्रांच युनिट-४कडून सर्व आरोपींना अटक
नागपूर — खापरखेडा परिसरातील पिकनिकला गेलेल्या तीन मित्रांवर झालेल्या रक्तरंजित हल्ल्याचा गुन्हा अखेर उघड झाला आहे. क्राईम ब्रांच युनिट-४ने फरार आरोपींना अटक करून तपासात मोठी प्रगती केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबरच्या संध्याकाळी सुशीलकुमार गेडाम, आशिष गोंडाणे आणि सचिन मिश्रा हे...
नागपुरात होणार गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्थेचा ‘परसेप्शन एक्स्पो’
नागपूर :गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था आणि एमएसएमई डीएफओ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजिकांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘परसेप्शन एक्स्पो-२०२५’ ६ ते ९ डिसेंबरदरम्यान सिव्हिल लाइन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात रंगणार आहे. महिला उद्योजकांच्या विविध व्यवसाय, कला आणि...
नवनीत राणांनी वरूड येथील सभेत अजित पवारांवर केला हल्लाबोल
अमरावती: वरुडमध्ये झालेल्या सभेत माजी खासदार नवनीत राणांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभव आणि राज्यातील वीज पुरवठ्याविषयी धाडसी वक्तव्ये केली. त्यांनी मतभेदांमुळे निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले, “जर माझ्या विरुद्ध मतांचा बंटवारा झाला नसता, तर...
महाराष्ट्रात शिक्षक संघटनांचा निषेध; ५ डिसेंबरला शाळा बंद अंदोलन
नागपूर: राज्यातील विविध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी राज्य सरकारच्या अन्यायकारक निर्णयांविरोधात शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५ रोजी राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला समर्थन देत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानेही राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा आदेश...
नागपुरात अंतरधर्मीय स्नेह उडाण कार्यशाळेत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नागपूर – अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी युवक बिरादरी भारत, के. डी. के. इंजिनिअरिंग कॉलेज आणि अंजुमन इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय ‘अंतरधर्मीय नवरंग स्नेह उडाण कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले. विविध धर्म, पंथ आणि पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना एका व्यासपीठावर आणत परस्पर समज,...
चक्रीवादळ ‘डिट्वा’चा परिणाम; राज्यात थंडीचा कडाका वाढला,नागपूरसह विदर्भात पावसाचा इशारा
मुंबई – श्रीलंकेच्या दिशेने तयार होत असलेल्या चक्रीवादळ ‘डिट्वा’चा परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवू लागला असून, राज्यातील हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. नागपूरसह विदर्भात गेल्या काही दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढली आहे, तर हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. हवामान...
गोंदिया जिल्ह्यात दुर्दैवी घटना; बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षीय बालिकेचा मृत्यू
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील इंदोरा-निमगाव परिसरात शनिवारी घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत मुलीचे नाव रुची देवानंद पारधी (वय ९) असे असून ती आपल्या वडिलांसोबत शेतात गेली असताना हा हल्ला झाला. मिळालेल्या...
मानकापुरमध्ये व्यावसायिकाचे बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल
नागपूर : मानकापुर परिसरातील सद्भावना नगर, गोधनी रोड येथील प्लॉट क्रमांक ५३ वर असलेल्या बंद घरात अज्ञात चोरांनी धाड घालत तब्बल १२.८५ लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २८ नोव्हेंबरच्या रात्री ८ ते २९ नोव्हेंबरच्या सकाळी...
नगरपंचायत-नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार थंडावणार; उद्या लाखो मतदार ठरवणार ग्रामीण महाराष्ट्राचा कारभार!
नागपूर : राज्यातील २७६ नगरपंचायती आणि २५ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता अधिकृतपणे संपला. पंधरा दिवसांपासून तालुका-तालुक्यांत चाललेल्या प्रचारजंगी वातावरणाला आज तात्पुरती ब्रेक लागली. मागील दोन आठवड्यांपासून रस्त्यांवर झळकणारे बॅनर-फलक, भोंग्यांची कर्णकर्कश गर्जना आणि स्थानिक नेत्यांचे धडाकेबाज...
नागपुरातील पहिल्या पुस्तक महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद; साडेपाच लाखांहून अधिक नागरिकांची उपस्थिती
नागपूर- नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) इंडिया, महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबाग मैदानावर भरविण्यात आलेल्या ‘नागपूर पुस्तक महोत्सव 2025’ ला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत इतिहास रचला. अवघ्या नऊ दिवसांत साडेपाच लाखांपेक्षा अधिक वाचकांनी महोत्सवाला...
ऑपरेशन थंडर: नागपूर पोलिसांची धडक कारवाई, एम.डी. ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड
नागपूर: नागपूर शहर पोलिसांनी एम.डी. ड्रग्जचा रॅकेट उखडून टाकत ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत जोरदार कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी ठरली असून, तीन आरोपींना ताब्यात घेतले गेले आहेत. कपिलनगर परिसरातील कामगार नगर...
कामठीत राष्ट्रवादीच्या उमेदवारावर तरुणाचा नोटांचा वर्षाव; निवडणूक आयोग कारवाई करणार का?
नागपूर – कामठी शहरातील प्रचारसभेत घडलेल्या एका विचित्र घटनेमुळे निवडणुकीचे राजकारण अचानक चांगलेच गाजू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शाहजहाँ शफावत अन्सारी यांच्या सभेत एका तरुणाने मंचावर जाऊन त्यांच्या अंगावर थेट नोटांचा वर्षाव केला. हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये कैद...
शब्दसृष्टीचे शिल्पकार म्हणजे लेखक, त्यांना मनःपूर्वक वंदन; डॉ. मोहन भागवत
नागपूर – लेखन ही केवळ कला नसून समाजाला दिशा देणारी शक्ती आहे. शब्दांचा अयोग्य वापर झाला तर परिणामही प्रतिकूल होतात. त्यामुळे मानवकल्याण हेच साहित्याचे ध्येय असावे,” अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी साहित्यनिर्मात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. रेशीमबाग...





