मनपा निवडणुकीत ‘काळ्या पैशांवर’ आयकर विभागाचा ब्रेक; २४ तास नियंत्रण कक्ष सुरू!
मुंबई - महाराष्ट्रात होणाऱ्या २०२५–२६ मधील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काळ्या पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी आयकर विभाग, मुंबईने २४ तास कार्यरत असलेला विशेष नियंत्रण कक्ष (Control Room) स्थापन केला आहे. निवडणुका मुक्त, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पडाव्यात, यासाठी हा...
नागपुरात अपघातांना ब्रेक; ‘ऑपरेशन यू-टर्न’मुळे उपराजधानी महाराष्ट्रात अव्वल!
नागपूर - नागपूर शहर पोलिसांनी जून २०२५ पासून राबवलेल्या ‘ऑपरेशन यू-टर्न’ या विशेष मोहिमेमुळे रस्ते अपघातातील मृत्यू मोठ्या प्रमाणात घटले असून, या कामगिरीमुळे नागपूर शहराने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या मोहिमेमुळे शेकडो नागरिकांचे प्राण वाचले असून रस्ते सुरक्षिततेच्या...
नागपूर जिल्ह्यात भाजपचा ऐतिहासिक विजय; ३० वर्षांचा रेकॉर्ड मोडला,मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले असून भाजपने नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत पक्षाने अभूतपूर्व यश मिळवत राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्या संख्येने भाजपने गेल्या तीन दशकांचा...
राज्यात भाजपचा झंझावात; ‘इतक्या’ नगराध्यक्षांसह पक्ष अव्वल, विभागनिहाय आकडेवारीत स्पष्ट वर्चस्व
नागपूर - महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांत महायुतीने मोठा राजकीय दबदबा निर्माण केला आहे. जाहीर झालेल्या निकालांनुसार, एकूण जागांपैकी तब्बल ७५ टक्क्यांहून अधिक ठिकाणी महायुतीचा विजय झाला असून, भारतीय जनता पक्षाने एकहाती १२९ नगराध्यक्ष आणि ३३०० पेक्षा अधिक नगरसेवक...
नागपूर जिल्ह्यातील कामठी येरखेडा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा; राजकिरण बर्वे यांचा दणदणीत विजय!
कामठी (नागपूर): कामठी येरखेडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. राजकिरण बर्वे यांनी १३०० मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. या निकालासह नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. शांततेत मतदान; भाजपला स्पष्ट बहुमत नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया...
नगरपंचायत–नगरपालिका निवडणूक निकाल;नागपूरमध्ये भाजपचा स्पष्ट वरचष्मा!
नागपूर - महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून नागपूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषद अशा दोन्ही स्तरांवर भाजप आघाडीवर असल्याचं चित्र आहे. नागपूर जिल्हा - नगराध्यक्ष पदांवर भाजपची सरशी आतापर्यंत समोर...
राष्ट्रवादी शरद पवार गट–शेकाप आघाडीचा काटोल नगराध्यक्षपदावर झेंडा;अर्चना देशमुख विजयी!
नागपूर : अखेर रविवारी नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून, राजकीय चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील १५ नगरपरिषदा व १२ नगरपंचायतींमध्ये कोणाचा वरचष्मा राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काटोल नगरपालिकेच्या सर्व १२ प्रभागांचे निकाल...
तुमची आमची, भाजपाची सर्वांची;नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीत विजयानंतर गडकरींचे विधान
नागपूर : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आनंद व्यक्त करत पक्ष नेतृत्व व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. “तुमची आमची, भाजपाची सर्वांची! असे म्हणत गडकरी यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुख्यमंत्री...
नागपुरात आचारसंहितेचा भंग;बेकायदेशीर दारूसाठा व १९.१६ लाखांची थार जप्त!
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीदरम्यान बजाजनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर दारूसाठा आणि सुमारे १८ लाखांची महिंद्रा थार चारचाकी वाहन जप्त केले आहे. या कारवाईत एकूण १९ लाख १६ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत...
नागपुरात आरटीओ चालान आकडेवारीत तफावत; 2024 मध्ये दुचाकी–खासगी कारधारकांवरच कारवाई!
नागपूर : कॅलेंडर वर्ष 2024 मधील नागपूर वाहतूक पोलिसांच्या चालानांची माहिती माहितीचा अधिकार (RTI) अंतर्गत समोर आली असून, वाहनप्रकारनिहाय कारवाईत मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आकडेवारीनुसार दोनचाकी आणि खासगी कारधारकांवरच सर्वाधिक दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ऑटोरिक्षा आणि...
नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसीतील आवादा कंपनीत दुर्घटना; मृतांचा आकडा ६ वर!
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात असलेल्या आवादा (Avaada) कंपनीच्या आवारात झालेल्या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा ६ वर पोहोचला असून, अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी काम सुरू असतानाच पाण्याची टाकी अचानक कोसळल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक...
रेल्वे प्रवाशांसाठी नवे तिकिट नियम लागू; केवळ मोबाईलवर तिकिट दाखवणे अपुरे ठरणार
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी तिकिटांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून अनारक्षित प्रवासासाठी आता तिकिटाची छापील (हार्ड कॉपी) प्रत जवळ बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापुढे केवळ मोबाईल फोनवर तिकिट दाखवून प्रवास करणे ग्राह्य धरले जाणार नाही. हा नियम रेल्वेच्या...
नागपूरजवळील बुटीबोरीतील आवादा कंपनीत अपघात;टँक टॉवर कोसळून तीन कामगारांचा मृत्यू
नागपूर : बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील आवादा (Avaada) कंपनीच्या परिसरात शुक्रवारी दुपारी भीषण अपघात घडला. कंपनीत सुरू असलेल्या कामादरम्यान निर्माणाधीन टँक टॉवर अचानक कोसळल्याने किमान तीन कामगारांचा मृत्यू, तर अनेक मजूर ढिगाऱ्याखाली दबले असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात...
नागपुरात हनीट्रॅपद्वारे खंडणी उकळणारी टोळी जेरबंद;7 पुरुष आरोपींसह 4 महिला आरोपींना अटक
नागपूर :नागपूर शहरात हनीट्रॅपच्या माध्यमातून नागरिकांना अडकवून कोट्यवधींची खंडणी उकळणाऱ्या टोळीवर गुन्हेशाखा व घरफोडी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ७ पुरुष आरोपींसह ४ महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एका ६२ वर्षीय सुज्ञ नागरिकाकडून खंडणी उकळल्याचा धक्कादायक...
आंतरजातीय विवाह केल्याने मुलीला संपत्तीतून वगळले; सुप्रीम कोर्टाचा वडिलांच्या मृत्युपत्राला दुजोरा
मुंबई - आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून मुलीला वडिलांच्या संपत्तीत हिस्सा नाकारण्यात आला आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. मात्र, सुप्रीम कोर्टानेही वडिलांनी केलेल्या मृत्युपत्रालाच अंतिम मान्यता देत मुलीचा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्टाचे पूर्वीचे निर्णय...
महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी: कोणत्या वर्षाचे कर्ज माफ होणार? सरकारकडून नवे संकेत
मुंबई - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, विशेषतः कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक घडामोड समोर येत आहे. विधानसभा निवडणुकांच्या काळात महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर आता राज्यात शेतकरी कर्जमाफीसंदर्भात हालचाली वेग घेत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन...
नागपुरात हुक्का पार्लरविरोधात भीमसेनेचा आक्रोश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
नागपूर- नागपूर शहरात बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लर आणि इतर अवैध व्यवसायांविरोधात भीमसेनेने आज तीव्र आंदोलन करत भव्य मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून भीमसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांना निवेदन सादर करत, तात्काळ कारवाई न झाल्यास शहरात व्यापक जनआंदोलन...
धारमपेठ झोनमध्ये पाणीपुरवठा पाइपलाईनला वारंवार झालेल्या नुकसानीमुळे तीव्र पाणीपुरवठा खंडित
नागपूर: गेल्या पाच दिवसांत तृतीय पक्ष कंत्राटदाराकडून OCW च्या २०० मि.मी. व्यासाच्या पाणीपुरवठा पाइपलाईनला चार वेळा नुकसान झाले आहे. यामुळे धारमपेठ झोनमधील रामनगर कमांड एरिया (CA) मध्ये पाणीपुरवठा गंभीररीत्या विस्कळीत झाला आहे. या वारंवार घडलेल्या घटनांमुळे रामनगर कमांड एरियाअंतर्गत येणाऱ्या पांढराभोळी,...
नाना पटोलेंमुळे काँग्रेस डबघाईला; अशोक चव्हाण यांचा आरोप
मुंबई : काँग्रेस पक्षाची सध्याची अवस्था चिंताजनक असून या परिस्थितीस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जबाबदार असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. पक्षातील नेते व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर काँग्रेस सोडून अन्य पक्षांमध्ये, विशेषतः भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने...
देशभरातील विद्यार्थ्यांनी चित्रांद्वारे दिला रस्ते सुरक्षेचा संदेश; केंद्रीय मंत्री गडकरींनी केले कौतुक
नागपूर: रस्ते सुरक्षा विषयावर देशभरातील विविध शाळांतील बालचित्रकारांनी सादर केलेल्या चित्रांचा वापर करून ‘जनआक्रोश – फॉर बेटर टुमारो’ या सामाजिक संस्थेने तयार केलेली 2026 ची अनोखी दिनदर्शिका नुकतीच केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात...
चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी भाजपकडून ६०० हून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
चंद्रपूर : येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक जाहीर होताच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने चंद्रपूर...





