Nagpur: Vikhe-Patil stages protest,refused to leave the Maha Assembly
Nagpur: Leader of Opposition Radhakrishna Vikhe-Patil on Tuesday refused to leave the House in protest despite adjournment, accusing the government of not providing information on compensation to cotton growers whose crops were hit by the pink bollworm. He was...
संभाजी भिडे यांच्या घटनाविरोधी विधानांविरूद्ध सरकार कारवाई करणार का?
मुंबई: धर्मनिरपेक्षता आपणास मान्य नसून, मनुस्मृती ही मनुने दिलेली पहिलीच घटना असल्यासंदर्भातील संभाजी भिडे यांचे वक्तव्य घटनाविरोधी असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची इच्छाशक्ती सरकार दाखवणार का?असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. संभाजी भिडे यांच्या सदरहू विधानाबाबत...
औरंगाबादच्या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!: विखे पाटील
मुंबई: औरंगाबादचा हिंसाचार हे राज्य सरकारचे मोठे अपयश असून, पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यामुळेच शहराची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. कायदा सुव्यवस्थेच्या निर्माण झालेल्या प्रश्नाला गृह खातेच जबाबदार असल्याचा आरोप करून या हिंसाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील...
काँग्रेस व गांधी-नेहरू कुटुंबाबाबत अपप्रचार करणार्या युट्यूब चॅनेल विरोधात गुन्हे दाखल
मुंबई: एका युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून धादांत खोटे व्हीडीओ अपलोड करून काँग्रेसचे दिवंगत पंतप्रधान तसेच प्रमुख नेत्यांबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार होत असल्याच्या विरोधात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार केली आहे. सदर...
भाजप २०१९ च्या निवडणुका भावनिक मुद्यावर लढवेल – विखे पाटील
नाशिक: केंद्र आणि राज्य सरकारकडे लोकांसमोर जाण्याचा कोणताही कार्यक्रम राहीलेला नाही. जातीय आणि सामाजिक तेढ निर्माण करून भावनिकतेच्या लाटेवर २०१९ च्या निवडणुका जिंकण्याचा प्री-प्लॅन या सरकारने तयार केला असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. अखिल भारतीय कॉंग्रेस...
एमआयडीसीतील घोटाळा सिद्ध, उद्योग मंत्र्यांना बडतर्फ करा!: विखे पाटील
मुंबई: औद्योगिक वापरासाठी अधिसूचित केलेल्या जमिनी विनाअधिसूचित करताना उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी एककल्ली व नियमबाह्य पद्धतीने निर्णय घेतल्याचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांच्या चौकशीतून निष्पन्न झाल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते...
हे सरकार आहे की नकारघंटा?: विखे पाटील
मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनी जनतेचे अनेक प्रश्न लावून धरले. पण सरकारने त्याला सतत नकारात्मक प्रतिसाद दिला. ही भूमिका पाहता हे सरकार आहे की नकारघंटा? अशी विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. अधिवेशन संपल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी...
मंडी टोळी आणि ‘त्या’ मंत्र्याच्या संबंधांची गुप्तचर विभागाकडून चौकशी करा!
मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुन्हा विदर्भातील कुख्यात मंडी टोळीवर हल्लाबोल केला. राज्यातील एक मंत्रीच या टोळीचा तारणहार असल्याच्या आरोपाचा त्यांनी पूनरूच्चारही केला. मुख्यमंत्र्यांना या प्रकरणातील वस्तुस्थिती जाणून घ्यायची असेल तर गुप्तचर विभागामार्फत चौकशी करावी, अशी...
…तर उरलेले उंदीर २०१९ मध्ये सरकारचे सिंहासनही पोखरणार!: विखे पाटील
मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज उंदीर घोटाळ्याचा संदर्भ वापरत सरकारवर तुफानी टोलेबाजी केली. सरकारचा गैरकारभार आणि उंदीर घोटाळ्याची अफलातून सांगड घालून त्यांनी भाजप-शिवसेना सरकारच्या कारभाराची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगली. गेल्या आठवड्यात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी...
भ्रष्टाचार व कायदा सुव्यवस्थेवरची चर्चा टाळण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी पळ काढला ! विखे पाटील यांचा आरोप
मुंबई: सत्ताधारी पक्षानेच सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याची नवीन प्रथा सुरु करुन, स्वतःचे अपयश झाकण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे. भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेवर कोणतीही चर्चा सभागृहात सरकारला होऊ द्यायची नसल्यामुळेच सत्ताधारी पक्षांनी सभागृह बंद पाडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील...
राज्यातील मंत्रीच गुंडांना पोसतात!
मुंबई: राज्यातील मंत्रीच गुंडाना पोसत असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत केला. यासंदर्भात त्यांनी 'मंडी टोळी' नामक एका कुख्यात टोळीचे उदाहरण दिले. नियम २९३ अंतर्गत विरोधी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पंचनामाच केला....
शिक्षक भरती केव्हा करणार? : विखे पाटील
मुंबई: मागील अनेक वर्षांपासून राज्यातील शिक्षक भरतीचा प्रश्न रखडला असून, डी.एड., बी.एड. केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने हे अधिवेशन संपण्यापूर्वी २४ हजार शिक्षकांच्या भरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील...
Traders looting farmers in purchase of tur, harbhara: Vikhe Patil
Mumbai: The Leader of Opposition in State Assembly Radhakrishna Vikhe Patil on Thursday demanded immediate start of government procurement centres as traders are looting farmers in purchase of tur and chana (gram) by offering very low rates. “As the Government...
तूर-हरभरा खरेदीत शेतकऱ्यांची लूट!: विखे पाटील
मुंबई: राज्यातील तूर-हरभऱ्याची शासकीय खरेदी बंद झाली असून, व्यापारी कवडीमोल भावाने करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवरील हा अन्याय रोखण्यासाठी सरकारने तातडीने शासकीय खरेदी केंद्रे सुरू करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विखे पाटील...
रेल्वे अॅप्रेंटिस आंदोलनावरील लाठीमाराची चौकशी करा!: विखे पाटील
मुंबई: रेल्वे अॅप्रेंटिसच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत केली. रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरल्यानेच बेरोजगारांना रोज आंदोलने करावी लागतात, असेही त्यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी झालेल्या या आंदोलनामुळे मुंबई शहरातील रेल्वे सेवा...
विधानभवनातील अग्निशमन यंत्रे कालबाह्य!: विखे पाटील
मुंबई: राज्याच्या विधानभवनातील अग्निशमन यंत्रे कालबाह्य झाली असून, माझ्या दालनासह अनेक ठिकाणी रिफिलची मुदत संपलेलीच उपकरणे लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात दिली. विखे पाटील यांनी सोमवारी दुपारी पॉइंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून या गंभीर...
भीमा-कोरेगाव प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद!: विखे पाटील
मुंबई: भीमा-कोरेगाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटेंचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. परंतु, भिडे गुरूजींविरूद्ध काहीच कारवाई का केली जात नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. एकबोटेंप्रमाणे भिडे गुरूजींवरही तातडीने कारवाई झाली पाहिजे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण...
अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा, सर्वसामान्यांची पाटी कोरीच!: विखे पाटील
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा मिळाला असून, समाजातील सर्वच घटकांची पाटी कोरी राहिल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर विखे पाटील यांनी चौफेर टीका केली. हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले...
विरोधकांसमोर सरकार झुकले, लाळ्या-खुरकत लसीकरण मोहिमेतील विलंबासाठी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार!
मुंबई: विरोधी पक्षांनी विधानसभेत प्रचंड दबाव निर्माण केल्याने जनावरांना दिल्या जाणाऱ्या लाळ्या-खुरकत लसीकरण मोहिमेतील विलंबासाठी कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा पशू संवर्धन राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी आज केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व विरोधी पक्षातील इतर आमदारांनी मांडलेल्या...
कमला मील अग्नितांडवातील सर्व संशयीत आरोपींची नार्को चाचणी करा!
File Pic मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यपालांना पत्र लिहून कमला मील आग प्रकरणातील संशयीत आरोपींची नार्को चाचणी करण्याची मागणी केली आहे. विखे पाटील यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबई येथील...
रब्बी पिकांसाठी दीडपट हमीभावाची घोषणा शुद्ध फसवणूक!: विखे पाटील
मुंबई: रब्बी पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्यात आल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला असून, हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ जुमलेबाजी असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त...