
नागपूर : शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शुक्रवारी पाच जणांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये बारावीचे शिक्षण घेत असताना जेईई परीक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीचाही समावेश आहे. सर्व प्रकरणांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
सर्वाधिक हळहळ व्यक्त केली जात असलेली घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजना परिसरात घडली. वैदही सुनील गुलगे (१७) ही विद्यार्थिनी तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली. वैदही बारावीत शिकत होती आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या जेईई परीक्षेची तयारी करत होती. तिच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले असून आई वंदना गुलगे या शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
शुक्रवारी रात्री सुमारे ९ वाजता वंदना घरी परतल्या असता त्यांना मुलगी मृतावस्थेत दिसली. घटनास्थळावरून एक भावनिक चिठ्ठीही मिळाली असून त्यामध्ये वैदहीने आईची माफी मागत तिच्या अपेक्षांवर खरी उतरू शकले नसल्याचे नमूद केले आहे. प्राथमिक माहितीनुसार शिक्षण आणि भविष्याबाबतच्या तणावातून हे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलीस ठाण्याचे पीएसआय सागर गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. आवश्यक पंचनामा आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमनगर येथे जयश्री माणिक वानखेडे (३७) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या दोन्ही मूत्रपिंडांचे कार्य बंद पडले होते आणि त्या दीर्घकाळापासून डायलिसिसवर होत्या. आजारपणामुळे त्या मानसिकदृष्ट्या त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे.
पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्यमनगर येथे अखिलेश पतीराम बरकडे (३०) मृतावस्थेत आढळून आले. मध्य प्रदेशातील सिवनी येथील रहिवासी असलेले अखिलेश हे सायटिका आजाराने त्रस्त होते. कौटुंबिक वाद आणि आरोग्याच्या समस्यांमुळे ते तणावात असल्याची माहिती आहे.
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोल्डन नगरी परिसरात अजय मनीराम परते (२४) यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ते घराजवळ मृतावस्थेत आढळले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
तर गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा परिसरात अमन तानाजी रंगारी (२८) हे त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, सर्व घटनांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे. प्रत्येक घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस विविध अंगांनी चौकशी करत आहेत.
रत्नागिरी में मानसून की दमदार दस्तक.. #MaharashtraNews #barish #mansoon #LatestNews
कॉफी विद कलेक्टर में छात्रों का सम्मान.. #MaharashtraNews #NewsUpdate #LatestNews #news
महायुति की एकजुटता का मिला लाभ.. #MaharashtraNews #PoliticalNews #election
नागपुर में सनसनीखेज हत्या.. #nagpurnews #murdernews #nagpur #news #latestnews
242 मतों से सईद खान की जीत.. #maharashtranews #election #politicsnews #newsupdate
जश्न रोकने पर पुलिस-भाजपा में विवाद.. #maharashtranews #solapurnews #bjp #police #politicsnews








