मुंबई : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाची घंटा वाजली आहे. विदर्भ विभाग वगळता महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सोमवारपासून नियमित अध्यापनाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य ठेवण्यात आली असून, ऑनलाइन वर्गांचा पर्याय उपलब्ध नसणार आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त राज्यभर ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ उत्साहात साजरा केला जात आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत विविध उपक्रमांद्वारे करण्यात येत असून, अनेक ठिकाणी पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वितरण करण्यात आले.
मात्र, यंदा विदर्भातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भातील शाळांना ३० जूनपर्यंत सुट्टी वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या भागातील शाळा जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक संस्था नियोजित वेळेनुसार सुरू झाल्या आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
दरम्यान, शिक्षण विभागाने पालकांनी आपल्या परिसरातील शाळांशी संपर्क ठेवावा, तसेच उष्णतेचा विचार करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
Nagpur: 17 वर्षीय क्रिकेटर की मौत, VCA चयन नहीं होने का जिक्र...
आरक्षण सुधार की मांग को लेकर रैली #NagpurNews #ReservationPolicy #Protest #Rally #MaharashtraNews
Nagpur Central Jail Murder Case: दोषी को उम्रकैद #NagpurNews #CentralJail #Crime #Murder...
राष्ट्र सुरक्षा के समर्थन में मौन पदयात्रा #MaharashtraNews #NationalUnity #Constitution #Youth
Abhijit Dipke का BJP पर बड़ा आरोप | #MaharashtraNews #AbhijitDipke #BJP #AmitShah...





