Published On : Tue, Jun 6th, 2023
By Nagpur Today Nagpur News

भाजप खासदाराने ज्या मुलीला दाखवला ‘द केरला स्टोरी ; तिने लग्न मंडप सोडून मुस्लिम प्रियकरासोबत काढला पळ !

Advertisement

भोपाळ : ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला जातीय रंग देण्यात आल्याच्या आरोपावरून वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच काही दिवसांपूर्वी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सिनेमागृहात १९ वर्षीय तरुणीला हा चित्रपट दाखविला.

याचदरम्यान साध्वी यांनी त्या मुलीला तिच्या मुस्लीम प्रियकर असलेल्या तरुणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. युसूफ असे तिच्या मुलीच्या प्रियकराचे नाव आहे. मात्र मुलीने साध्वी प्रज्ञा यांचे न ऐकता लग्न मंडपातूनच पळ काढल्याचा धक्कादायक घटना घडली आहे.

Gold Rate
08 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,01,800 /-
Gold 22 KT ₹ 94,700/-
Silver/Kg ₹ 1,15,800/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून पेटला वाद :
‘द केरला स्टोरी’ चित्रपटातील कथा ही केरळमधील एका हिंदू महिलेची कथा आहे ज्याची भूमिका अदा शर्माने केली आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी त्यांचे ब्रेनवॉश करून त्याला सीरियात पाठवले जाते, जिथे त्याला आयएस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यास भाग पाडले जाते. गेल्या वर्षी टिझर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता.

हिंदू तरुणी शेजारच्या मुस्लिम तरुणासह पळून गेली –
भोपाळच्या नया बसेरा भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफ हा तिचा शेजारी आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफसोबत लग्नापूर्वीच मुलगी पळून गेली होती. 30 मे रोजी मुलीचे लग्न ठरले होते. लग्न मंडप सोडून लग्नासाठी ठेवलेली रोख रक्कम व दागिने घेऊन मुलगी युसूफसोबत पळून गेल्याची माहिती आहे.

मुलीच्या नातेवाईकांनी हे केले आरोप –
भोपाळच्या कमला नगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत मुलीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, युसूफने त्यांच्या मुलीला गोड बोलून फसवले आणि नंतर तिला घेऊन पळून गेला. युसूफने मुलीच्या नावावर बँकेचे कर्जही घेतले आणि तिला ईएमआय भरण्यास भाग पाडले, असा आरोप त्यांनी केला.

मुलगी म्हणाली – स्वतःच्या इच्छेने पळून गेली
मात्र, कुटुंबीयांच्या आरोपांच्या विरोधात, मुलीने पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीजबाबात म्हटले आहे की, ती युसूफसोबत पळून गेली .कोणत्याही दबावाशिवाय स्वतःच्या इच्छेने पळून गेल्याचे ती म्हणाली.

Advertisement
Advertisement