
नागपूर जिल्ह्यातील काटोल मधील राजुळगाव येथे एसबीएल एनर्जी या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात १७ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. या दुर्दैवी घटनेत आपले कर्ते पुरुष गमावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. मृत कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
या घटनेची सखोल चौकशी होऊन जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.
या कठीण प्रसंगी संपूर्ण नागपूर जिल्हा पीडित कुटुंबीयांसोबत खंबीरपणे उभा आहे.
दिवंगत आत्म्यांना शांती लाभो आणि जखमींना लवकरात लवकर पूर्ण आरोग्य प्राप्त होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
Advertisement








