Published On : Sat, Aug 16th, 2025
By Nagpur Today Nagpur News

‘मिशन सुदर्शन चक्र’मुळे संरक्षण क्षमतेला बळकटी;लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांची नवी घोषणा

Advertisement

नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या संरक्षण धोरणात मोठा बदल घडवू शकणारी ‘मिशन सुदर्शन चक्र’ ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. भाषणादरम्यान त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मधील जवानांच्या धैर्याचे गौरवगान केले आणि पाकिस्तानला दहशतवादाबाबत ठाम इशारा दिला.

मोदींनी सांगितले की, ‘मिशन सुदर्शन चक्र’ ही पूर्णतः स्वदेशी, अत्याधुनिक आणि अचूक शस्त्र प्रणाली असेल. ती केवळ शत्रूचा हल्ला निष्प्रभ करणार नाही, तर त्याला तातडीने व प्रभावी प्रत्युत्तरही देईल. येत्या १० वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार असून, संशोधनापासून उत्पादनापर्यंत सर्व प्रक्रिया भारतातच पार पडणार आहे. भविष्यातील युद्धाच्या बदलत्या स्वरूपाला लक्षात घेऊन ही प्रणाली संवेदनशील ठिकाणी तैनात केली जाईल.

Gold Rate
Mar 30,2026 - Time 10.25Hrs
Gold 24 KT ₹ 1,45,500 /-
Gold 22 KT ₹ 1,35,300 /-
Silver/Kg ₹ 2,29,600/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पंतप्रधानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदर्भ देताना १९९७ मधील पहलगाम नरसंहाराची आठवण करून दिली. त्या घटनेनंतर सैन्याला दिलेल्या मोकळ्या हातामुळे पाकिस्तानला बसलेला फटका आजही जाणवतो, असे त्यांनी नमूद केले.

दहशतवादाच्या मुद्द्यावर मोदी ठामपणे म्हणाले की, भारत आता अणुशक्तीच्या धमक्या सहन करणारा देश नाही. “जो कोणी आपल्या सुरक्षिततेशी खेळेल, त्याला आपल्या वेळेनुसार आणि आपल्या अटींवर प्रत्युत्तर दिले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.

या घोषणांमधून भारताच्या संरक्षण व्यवस्थेत आत्मनिर्भरता, कठोरता आणि अचूकता या तिन्ही गोष्टींना प्राधान्य दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘मिशन सुदर्शन चक्र’ ही त्यासाठीची नवी पायरी ठरणार आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement