Published On : Thu, Feb 13th, 2025
By Nagpur Today Nagpur News

…अन्यथा रेशन कार्डमधून तुमचे नाव होणार रद्द; ‘या’ तारखेच्या आधी ई-केवायसी करणे बंधनकारक!

Advertisement

नागपूर : सरकारी रेशनचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक बनवण्यासाठी आणि फक्त पात्र लाभार्थ्यांनाच रेशनचा लाभ मिळावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. रेशन कार्डसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही वेळेत ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर तुमचे नाव रेशनकार्डमधून कमी केले जाऊ शकते आणि तुम्हाला सरकारी रेशन मिळणार नाही.

नागपूर शहरातील एकूण ४ लाख २४ हजार १९८ कुटुंबे या योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्याचा लाभ घेत आहेत. यापैकी ३ लाख ७८ हजार ४४० प्राधान्य गटाचे रेशनकार्डधारक आहेत आणि ४५ हजार ७५८ अंत्योदय गटाचे रेशनकार्डधारक आहेत.

Gold Rate
27 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,60,100/-
Gold 22 KT ₹ 1,48,900 /-
Silver/Kg ₹ 3,43,900 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रेशनकार्डधारकांना जवळच्या रेशन केंद्रात जाऊन त्यांच्या आधार कार्ड आणि रेशनकार्डने ई-केवायसी करावे लागेल. परंतु समस्या अशी आहे की संपूर्ण शहरातील ६०० रेशन दुकानांसाठी फक्त ५० ऑपरेटर नियुक्त करण्यात आले आहेत, ज्यामुळे लोकांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

जर तुम्ही अजून ई-केवायसी केले नसेल, तर लवकरच तुमच्या जवळच्या रेशन सेंटरमध्ये जा, अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकते. या सरकारी योजनेचा लाभ घेत राहण्यासाठी, २८ फेब्रुवारीच्या अंतिम मुदतीपूर्वी ई-केवायसी करणे गरजेचे आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement