
नागपूर : शहरात झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक भाग जलमय झाले, तर अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा फटका बसला. दरवर्षी नालेसफाई आणि नदी स्वच्छतेवर कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याचे महापालिकेकडून सांगितले जाते. मात्र, एवढा खर्च करूनही शहरात पूरस्थिती का निर्माण झाली, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोल्हारकर यांनी उपस्थित केला आहे.
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ ते २०२६ या चार वर्षांच्या कालावधीत नागपूर महापालिकेने नालेसफाई आणि नदी स्वच्छतेच्या कामांवर ५२ कोटी १७ लाख रुपये खर्च केले आहेत. तरीही शहरातील अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्याने या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अभय कोल्हारकर यांनी महापालिकेने नालेसफाईच्या कामांचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करून प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता तपासावी आणि त्रुटी आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली आहे.
त्यांच्या मते, शहरातील वाढत्या सिमेंट रस्त्यांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसल्याने पाणी तुंबण्याची समस्या अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था आणि वैज्ञानिक नियोजनाची गरज आहे.
तसेच, शहरातील काही भागांमध्ये पाणी साचले नाही, तर काही भाग पूर्णपणे जलमय झाले. त्यामुळे नेमकी त्रुटी कुठे आहे, याचा सखोल अभ्यास करून नागरिकांच्या पैशाचा योग्य वापर होईल आणि भविष्यात पूरस्थिती टाळता येईल, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली.
ओबीसी मुद्दे पर कांग्रेस पर भाजपा हमला #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha #nagpurnews
परमबीर सिंह पर देशमुख ने उठाए सवाल #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha #nagpurnews
उपचुनाव नतीजों से बदला जनमत का संकेत #maharashtranews #delhi #newsupdate #maharashtra
कलमना पुलिस ने सुलझाई चोरी की गुत्थी #Nagpur #NagpurNews #CrimeNews #Theft #ThiefArrested...
'गूंगी गुड़िया' टिप्पणी पर भड़की एनसीपी #maharashtranews #solapur #newsupdate #maharashtra
जाफराबाद में गुटखा कारोबार पर पुलिस का शिकंजा #maharashtranews #jalna #newsupdate #maharashtra




