Published On : Tue, Sep 26th, 2017

मोदी सरकार का नारा ‘बेटी पढ़ाओ बेटी पीटवाओ’

Advertisement

नागपुर: देशात आज सरकार महिला सक्षमीकरण सशक्तिकरणाचे आश्वासन देत आहे, बेटी पढ़ाओ बेटी बचाओ चा नारा देत आहे अशे असूनही नवरात्राच्या उतसवामध्ये जेव्हा आपण नवकनयांची पूजा करतो अश्या दिवसांमध्ये पंतप्रधानांच्या मतदारसंघांमध्ये BHU येथील ज्या विद्यार्थिनी यानी सक्षम पने निर्भिड पने समोर येवून घडलेल्या घटनेची तक्रार केलि अश्या विद्यार्थिनींचे कौतुक करने तर दूर सेकड़ो विद्यार्थनींवर व् पत्रकारांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ आज नागपुर लोकसभा युवक कांग्रेसने उत्तर नागपुर चे आमदार मिलिंद माने यांच्या घरासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विरोधात घोषणा दिल्या. बेटिओ के सन्मान में युवक कांग्रेस मैदान में, पत्रकारों के सन्मान में युवक कांग्रेस मैदान में ाशे नाते लावण्यात आले.

२०१४ सालीज्या प्रमाणे युवा विद्यार्थी,विद्यार्थिनी यानी देशात मोदींच्या प्रलोब्नात येवून (२ करोड़ रोजगार) मोदीना पंतप्रधान केले याच पंतप्रधानाने आज देशात आर्थिक मंदी तर आनलीच सही पण विद्यार्थांचे स्कॉलरशिपचे प्रश्न असो की बेरोजगारी असो अशे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांमधे आज भेडसावत आहे, विद्यार्थ्यांचा या सरकार विरोधात रोषाचे उत्तम उदहारण म्हणजे दिल्ली येथी dusu मध्ये झालेल्या निवडणुकीचे एक हाती NSUI ने सत्ता मिळवली आहे,

या सर्व बाबीना लक्षात घेवून विद्यार्थ्याने आपल मुंडक बाहर काढू नए व् सरकार विरोधात जावु नए या करता असा लाठीचार्ज करूँन विद्यार्थ्यांचा संवाद, हक्क दाबण्याचा कट मोदी सरकारने रचला आहे अशे युवक कांग्रेस अध्यक्ष नगरसेवक बंटी शेळके म्हणाले, तसेच मोदी सरकार लोकशाही चा वापर न करता हूकूमशाही पद्धतीने देशाच्या काना-कोपऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे,विकासाच्या नावावर वोट मोदी सरकारने मागितले होते २०१४ पासून विकास मिसिंग आहे, वित्तीय आणिबानी आज देशात या सरकारमुळे आहेच पण आता देश आनिबाणिच्या मार्गावर पंतप्रधानांनी नेवून ठेवला आहे व् लावू पहात आहे अशे रंजीत सफेलकर म्हणाले.

आजचे आंदोलन नगरसेविका नेहा राकेश निकोसे,युवक कांग्रेस महासचिव राकेश निकोसे यांच्या नेतृत्वात घेण्यात आले युवक कांग्रेस अध्यक्ष नगरसेवक बंटी बाबा शेळके हे प्रमुखतेने उपस्तिथ होते.

आजच्या आन्दोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थिनी व् महिलानी काठ्या हातात घेवून म्हणाल्या की मुलींवर लाठीचार्ज करता आता भाजप वालो मत तर मागायला या आम्ही दाखवतो,दिलेले प्रलोभन आणि स्त्रियांवरती अन्याय काय राहते तर.