नागपूर : सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि आयएमईआय क्रमांकाच्या मदतीने पोलिसांनी विविध कंपन्यांचे तब्बल ५५ मोबाईल फोन शोधून काढले असून ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
गेल्या काही महिन्यांत सिताबर्डी परिसरातील बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींचा गांभीर्याने तपास करत पोलिसांनी अत्याधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करून हरवलेल्या मोबाईलचा माग काढला. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे ९ लाख ५० हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.
आपले हरवलेले मोबाईल सुरक्षितपणे परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत सिताबर्डी पोलिसांचे आभार मानले. या कारवाईमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आणखी दृढ झाला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सिताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
तुकाराम मुंढे के नाम से मचा हड़कंप.. #maharashtranews #tukarammundhe #latestnews
विलय की चर्चा पर सुप्रिया सुळे का इनकार.. #nagpurnews #supriyasule #politicalnews
समेत पट्टियों पर मनसे का कड़ा विरोध.. #maharashtranews #mns
रोहित पवार की तबीयत फिलहाल स्थिर ...#news #latestnews #politicsnews #maharashtranews
किसानों की जमीन बचाने उठी बुजुर्ग आवाज ...#news #latestnews #maharashtranews #maharashtra








