
नागपूर : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात देशाने विकासाच्या क्षेत्रात ऐतिहासिक प्रगती केली असून पायाभूत सुविधा, वाहतूक, जलव्यवस्था, विमानसेवा आणि पर्यायी ऊर्जेच्या क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडून आल्याचा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला. शनिवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेत विविध विकास प्रकल्पांची माहिती दिली.
गडकरी म्हणाले की, 2014 पूर्वी देशात ज्या वेगाने विकास व्हायला हवा होता, तो झाला नव्हता. मात्र गेल्या बारा वर्षांत केंद्र सरकारने विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली. त्यामुळे आज भारत जागतिक स्तरावर वेगाने प्रगती करणाऱ्या देशांमध्ये गणला जात आहे.
त्यांनी सांगितले की, देशभरात राष्ट्रीय महामार्गांचे विस्तीर्ण जाळे उभे राहिले आहे. रस्ते बांधकामामुळे शहरांसह ग्रामीण भागाची कनेक्टिव्हिटी मजबूत झाली आहे. बंदरांच्या आधुनिकीकरणामुळे व्यापाराला चालना मिळाली असून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम बनली आहे. याचबरोबर विमानतळांची संख्या वाढल्याने हवाई प्रवास सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आला आहे.
नागपूरच्या विकासाचा विशेष उल्लेख-
नागपूर शहराच्या विकासाबाबत बोलताना गडकरी यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा उल्लेख केला. ‘हर घर जल’ योजनेमुळे शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत असल्याचे सांगत त्यांनी यापूर्वी पाण्यासाठी मोर्चे निघायचे, मात्र आता ती परिस्थिती बदलल्याचे नमूद केले.
नागपूर विमानतळाच्या विस्ताराबाबतही त्यांनी माहिती दिली. नागपूरला आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीचे महत्त्वपूर्ण केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, भविष्यात हे विमानतळ देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जैवइंधनावर भर; शेतकऱ्यांसाठी नवी संधी-
पर्यायी इंधन आणि हरित ऊर्जेच्या वापरावर भर देताना गडकरी यांनी जैवइंधनाच्या वाढत्या वापराबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी सांगितले की, धानाच्या परालीपासून बिटुमेन आणि विमानांसाठी लागणारे इंधन तयार करण्याचे प्रयोग सुरू आहेत. या इंधनाचा वापर वाढल्यास पर्यावरण संरक्षणासोबतच शेतकऱ्यांनाही अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होईल.
विमान इंधनामध्ये जैवइंधनाचा ठरावीक प्रमाणात समावेश करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. भविष्यात भारतीय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या जैवइंधनावर विमानसेवा चालेल, अशी संकल्पना सरकारसमोर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पेट्रोल-डिझेलऐवजी पर्यायी इंधनाचा आग्रह-
गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याचे आवाहन केले. वाहने सीएनजी, इथेनॉल, बायोगॅस किंवा इतर पर्यायी इंधनावर चालविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे प्रदूषण कमी होईल आणि इंधन आयातीवरील खर्चातही बचत होईल, असे ते म्हणाले.
‘नागपूरमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक विकासकामे’-
नागपूरच्या विकासाचा उल्लेख करताना गडकरी म्हणाले की, शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली आहेत. रस्ते, उड्डाणपूल, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि औद्योगिक विकासाच्या क्षेत्रात अपेक्षेपेक्षा अधिक काम झाले आहे. नागपूरला देशातील प्रगत आणि आधुनिक शहरांच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेताना गडकरी यांनी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला ‘नव्या भारताच्या उभारणीचा पाया’ असे संबोधले. आगामी काळातही विकासाचा वेग कायम ठेवत भारताला आर्थिक महासत्ता बनविण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
तुकाराम मुंढे के नाम से मचा हड़कंप.. #maharashtranews #tukarammundhe #latestnews
विलय की चर्चा पर सुप्रिया सुळे का इनकार.. #nagpurnews #supriyasule #politicalnews
समेत पट्टियों पर मनसे का कड़ा विरोध.. #maharashtranews #mns
रोहित पवार की तबीयत फिलहाल स्थिर ...#news #latestnews #politicsnews #maharashtranews
किसानों की जमीन बचाने उठी बुजुर्ग आवाज ...#news #latestnews #maharashtranews #maharashtra







