Published On : Thu, Nov 21st, 2019

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली

Advertisement

मुंबई: मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात शहीद झालेल्या 105 हुतात्म्यांना आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, कोकण विभागाचे आयुक्त शिवाजी दौंड, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनीही यावेळी पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले.

यावेळी मंत्रालय, महापालिका, पोलीस विभाग, नौदलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.