Published On : Wed, Sep 30th, 2020

Maharashtra Lockdown: राज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले; ‘हे’ आहेत महत्त्वाचे निर्णय

Advertisement

मुंबई: मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात येत असताना महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय जाहीर करताना आणखी काही बाबतीत दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.

लॉकडाऊनबाबत राज्य सरकारने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार बहुप्रतीक्षित रेस्टॉरंट आणि बारबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ५ ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट आणि बार खुले होणार आहेत. ५० टक्के क्षमतेने ते चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे.