मुंबई: मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत पारदर्शकता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन आदेश जारी केला आहे. आता या योजनेतील सर्व पात्र महिलांनी २ महिन्यांच्या आत ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे बंधनकारक आहे.
योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-केवायसीची सुविधा https://ladakibahin.
मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सशक्तीकरण देणे तसेच त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यास मदत करणे आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांना थेट आर्थिक मदत दिली जाते.
शासनाच्या या नवीन निर्णयानुसार, चालू आर्थिक वर्षात ई-केवायसी न केल्यास त्या लाभार्थ्या पुढील कार्यवाहीसाठी पात्र ठरतील. तसेच भविष्यात दरवर्षी जून महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहील. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, ही प्रक्रिया सोपी असून भविष्यात इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही उपयुक्त ठरेल.