Published On : Mon, May 12th, 2025
By Nagpur Today Nagpur News

भारत -पाकिस्तान युद्धविरामाचा निर्णय राजकीय हेतूंनी प्रेरित ; विजय वडेट्टीवारांचा केंद्रावर आरोप

Advertisement

नागपूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धविरामावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, हा निर्णय देशाच्या हितासाठी नसून सत्ताधाऱ्यांच्या राजकीय फायद्याच्या गणिताचा भाग आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, DGMO स्तरावरील बैठक ही केवळ औपचारिक असून, अशा बैठका प्रत्यक्ष कार्यवाहीऐवजी नुसती दिखावा करण्यापुरत्याच मर्यादित असतात. सरकारने पूर्वी जे स्थान मिळवलं होतं, ते आता गमावल्याचंही त्यांनी नमूद केलं. “दोन पावलं पुढे आणि मग पुन्हा मागे” ही केंद्राची धोरणं जनतेला फसवणारी असल्याचं त्यांनी सांगितलं.

Gold Rate
02 Aug 2025
Gold 24 KT 99,800 /-
Gold 22 KT 92,800/-
Silver/Kg ₹ - ₹- ₹1,11,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना वडेट्टीवार म्हणाले, “अमेरिकेचा दबाव मोदींवर स्पष्टपणे जाणवतो. ट्रम्प यांच्यासोबतच्या चर्चेत मोदींनी मौन का पाळलं? युद्ध थांबताच ट्रम्पकडून श्रेय घेतलं गेलं, याचा अर्थ भारत स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाही, असं चित्र निर्माण झालं आहे.”

वडेट्टीवार यांनी यावर भर देत सांगितलं की, भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेकदा पाकिस्तानला धक्का दिला आहे. मात्र, आताचं सरकार मागे सरकू लागल्याने देशाची प्रतिष्ठा धूमकेतूसारखी खाली आली आहे. हे सरकारचे कमकुवत नेतृत्व दर्शवते आणि यामागे निव्वळ राजकीय लाभ आहे, असं काँग्रेसचे मत आहे.

Advertisement
Advertisement