Published On : Mon, May 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

रेल्वे प्रवासात नियम मोडले तर कारवाई अटळ; दंडासोबत तुरुंगवासाचीही शक्यता

Advertisement

नवी दिल्ली : दररोज लाखो प्रवासी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशभर प्रवास करत असतात. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, शांत आणि सुरळीत राहावा यासाठी रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास दंड, कायदेशीर कारवाई आणि काही प्रकरणांत थेट जेलची शिक्षाही होऊ शकते.

मद्यपान केल्यास कठोर कारवाई-
रेल्वे प्रवासादरम्यान किंवा स्टेशन परिसरात मद्यपान करण्यास पूर्ण बंदी आहे. तसेच दारूच्या नशेत रेल्वेत चढणे, सहप्रवाशांशी वाद घालणे किंवा गोंधळ घालणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.अशा प्रकारचे वर्तन आढळल्यास संबंधित प्रवाशावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. काही प्रकरणांमध्ये तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मोबाईलवर मोठ्याने बोलणेही ठरू शकते महाग-
रेल्वे प्रवासात मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलल्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येतात. विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्याने संभाषण केल्यास इतर प्रवाशांच्या झोपेचा भंग होतो.जर सहप्रवाशांनी याबाबत तक्रार केली, तर रेल्वे प्रशासनाकडून संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.

मिडल बर्थसाठीही आहे ठराविक वेळ-
अनेक प्रवाशांना माहित नसलेला एक महत्त्वाचा नियम म्हणजे मिडल बर्थ वापरण्याची वेळ. रेल्वे नियमानुसार मधला बर्थ रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच उघडून वापरता येतो.त्या वेळेनंतर तो खाली करून इतर प्रवाशांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असते.

Advertisement

रात्री गोंधळ घातल्यास दंड-
मित्र किंवा कुटुंबासोबत प्रवास करताना अनेकदा रात्री उशिरापर्यंत गप्पा आणि हशा सुरू असतो. मात्र, त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होत असल्यास त्याची तक्रार रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली जाऊ शकते.तक्रार योग्य आढळल्यास संबंधित प्रवाशांवर दंडाची कारवाई होण्याची शक्यता असते.

नियम पाळल्यास प्रवास होईल सुखकर-
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी हे नियम लागू केले असून सर्वांनी त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वतःचाही प्रवास आरामदायी राहतो आणि इतर प्रवाशांनाही त्रास होत नाही.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges