Published On : Tue, Sep 5th, 2023
By Nagpur Today Nagpur News

जी-20 निमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ चा उल्लेख, ‘इंडिया’ नाव हटविले ; विरोधक आक्रमक !

Advertisement

नागपूर : राजधानी दिल्लीत आयोजीत करण्यात आलेल्या जी 20 (G-20) परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पण याच जी 20 परिषदेमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. 9 सप्टेंबरला राष्ट्रपती भवनात G20 डिनरचे आयोजन करण्यात आले. या निमंत्रण पत्रिकेत ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख कारण्यात आला असून इंडिया नाव हटविण्यात आले आहे, यावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आक्षेप घेतला आहे. आपल्या ट्वीटमध्ये जयराम रमेश म्हणाले, संविधानाच्या आर्टिकल एक नुसार, भारत जो इंडिया आहे. जो अनेक राज्यांचा समूह म्हणून ओळखला जातो. परंतु आता या राज्यांच्या समुहावर हल्ला होत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांन केले होते आवाहन – गुवाहाटीमध्ये सरसंघाचे नेते मोहन भागवत यांनी लोकांना ‘इंडिया’ऐवजी भारत बोलण्याचे आवाहन केलं आहे.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आपल्या देशाचं नाव इंडिया नसून भारत आहे, असं भागवत यांनी सांगितले. मोहन भागवत म्हणाले की, शतकानुशतके या देशाचे नाव भारत आहे, ‘इंडिया’ नाही. म्हणून आपण देशाचे जुने नाव वापरावे. बोलताना आणि लिहिताना सर्वत्र भारत असा उल्लेख करावा.

Advertisement
Advertisement