Published On : Tue, Jun 2nd, 2020

शेतकऱ्यांना खरिपासाठी बिनव्याजी कर्ज मिळावे : बावनकुळे

Advertisement

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी

नागपूर: पावसाळा सुरू होत असून त्यासोबतच शेतकऱ्याचा खरीप हंगामही सुरू होत आहे. यंदाची कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खरीपासाठी राज्य शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना त्यांनी एक पत्र पाठवून ही मागणी केली आहे.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोविड 19 मुळे तीन महिन्यापासून सुरू असलेल्या संचारबंदीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. शेतकऱ्याजवळ बी बियाण्यांसाठी पैसे नाही. शेतकऱ्याची ही आर्थिक कुचंबणा लक्षात घेता शेतकऱ्यांना त्वरित बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

शासनाने ग्रामपंचायत स्तरावर कृषी विभागातर्फे कर्ज मेळावे घेऊन शेतकऱ्यांला बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी आपण करीत आहोत, असेही बावनकुळे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement