
नागपूर : ठाकरे गटातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राज्याचे राज्यमंत्री तथा शिवसेना नेते आशिष जयस्वाल यांनी शिंदे सेनेची भूमिका स्पष्ट केली. ठाकरे गटातील मतभेद हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचे सांगतानाच, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या कोणाच्याही स्वागतासाठी शिवसेना तयार असल्याचे त्यांनी म्हटले.
नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना जयस्वाल म्हणाले, “सध्या आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. ठाकरे गटात नेमके काय सुरू आहे, यावर आम्ही भाष्य करणार नाही. मात्र, बाळासाहेबांच्या विचारांसाठी कोणी येत असेल, तर त्यांचे स्वागतच आहे.”
२०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडानंतर पक्ष अधिक मजबूत झाला असल्याचा दावा करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. “आज राज्यभरातून आणि देशभरातून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला प्रतिसाद मिळत आहे. पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असून शिवसेना सातत्याने विस्तारत आहे,” असे ते म्हणाले.
जयस्वाल यांनी ठाकरे गटावर अप्रत्यक्ष टीका करताना सांगितले की, “एका बाजूला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतो आहे, तर दुसऱ्या बाजूला निराशेचे वातावरण आहे. पक्ष हा कार्यकर्त्यांचा असतो, कोणत्याही एका व्यक्तीची मालमत्ता नसतो. नेतृत्व सक्षम असेल तरच पक्ष वाढतो.”
संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी म्हटले, “शिवसेनेची जी अवस्था झाली, त्यामागे सर्वात मोठे कारण संजय राऊत आहेत. पक्षाचे नुकसान कोणी केले असेल, तर त्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली पाहिजे.”
आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा स्ट्राइक रेट आणखी वाढेल आणि पक्षाचे अधिकाधिक आमदार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत जयस्वाल यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार देशभर पोहोचवण्याचा निर्धारही व्यक्त केला.
नागपुर में 5 घरफोड़ियों का खुलासा, शातिर चोर गिरफ्तार #nagpurnews #crime #news...
संजय देशमुख पर विश्वासघात का आरोप.. #maharashtranews #shivsena #news #politicsnews
मुंबई में हल्की बारिश से मौसम सुहाना
फूड पॉइजनिंग के बाद शोरमा सेंटर पर छापा
एनसीपी के सभी सांसद शरद पवार संग: अनिल देशमुख #nagpurnews #anildeshmukh #ncp...
मानसून में देरी से किसान चिंतित.. #maharashtranews #kisan #barish #news #update








