Published On : Tue, Jul 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात आंदोलनाच्या आड अराजकतेचा डाव; काहींचा स्वार्थी अजेंडा उघड, मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

Advertisement

मुंबई : दिल्लीतील आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही घटक आंदोलनाचा वापर करून जाणूनबुजून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित असला, तरी हिंसाचार आणि कायदा हातात घेण्याला कोणतीही मुभा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, शांततापूर्ण आंदोलन आणि हिंसक जमाव यात स्पष्ट फरक आहे. आंदोलनाच्या नावाखाली सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड, पोलिसांवर हल्ले किंवा कायदा मोडण्याचा प्रयत्न हा लोकशाहीचा भाग ठरू शकत नाही. अशा घटनांवर सरकार आवश्यक ती कठोर कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री म्हणाले की, ठोस नेतृत्व नसलेल्या आंदोलनांमध्ये काही स्वार्थी आणि विघातक प्रवृत्ती सहज शिरकाव करतात. हे लोक मूळ मागण्यांपेक्षा गोंधळ, तणाव आणि राजकीय अस्थिरता निर्माण करण्यावर भर देतात. त्यामुळे आंदोलनाचा उद्देश बाजूला पडतो आणि वेगळाच अजेंडा पुढे आणला जातो.

दिल्लीतील घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी आरोप केला की, काही राजकीय पक्ष आणि असंबंधित संघटना आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. संबंधित विषयाशी कोणताही संबंध नसतानाही काही घटक वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले.

Advertisement

पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करताना फडणवीस म्हणाले की, कोणत्याही सरकारला नागरिकांवर बळाचा वापर करणे पसंत नसते. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागल्यास कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला निर्णायक पावले उचलावी लागतात. दिल्लीत पोलिसांनी मोठा संयम दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व आंदोलनकर्त्यांवर टीका करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक जण प्रामाणिक भावनेतून आंदोलनात सहभागी झाले असतील. मात्र, त्याच गर्दीत काही जण स्वतःचा राजकीय किंवा वैयक्तिक अजेंडा राबवत असल्याचे स्पष्ट दिसते. संबंधित प्रश्नाशी त्यांचा फारसा संबंध नसून अराजकता निर्माण करणे हेच त्यांचे उद्दिष्ट असल्याचा आरोप त्यांनी केला.

सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता फडणवीस यांनी थेट भाष्य टाळले. मात्र, आंदोलनात सर्वच लोक एकाच हेतूने सहभागी झालेले नाहीत, हे स्पष्ट असल्याचे सांगत काही घटक परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याची भूमिका त्यांनी पुन्हा मांडली.

Advertisement
बाइक से गिराकर किया वार, एक गिरफ्तार दो अन्य की तलाश #vidarbhanews #nagpur #nagpurnews #crimenews

बाइक से गिराकर किया वार, एक गिरफ्तार दो अन्य की तलाश #vidarbhanews...

प्रॉपर्टी विवाद में दामाद की पीट-पीटकर हत्या, ससुराल पक्ष के दो आरोपी गिरफ्तार

प्रॉपर्टी विवाद में दामाद की पीट-पीटकर हत्या, ससुराल पक्ष के दो आरोपी...

वणी में सोनम वांगचुक समर्थन में सर्वदलीय प्रदर्शन #vidarbhanews #wani #news #vidarbha #nagpurnews

वणी में सोनम वांगचुक समर्थन में सर्वदलीय प्रदर्शन #vidarbhanews #wani #news #vidarbha...

नीट पेपर लीक पर छात्रों का प्रदर्शन #vidarbhanews #nagpur #vidarbha #nagpurnews #nagpurtoday #news

नीट पेपर लीक पर छात्रों का प्रदर्शन #vidarbhanews #nagpur #vidarbha #nagpurnews #nagpurtoday...

वडेट्टीवार ने सदाभाऊ खोत पर बोला तीखा हमला #maharashtranews #mumbai #newsupdate #maharashtra

वडेट्टीवार ने सदाभाऊ खोत पर बोला तीखा हमला #maharashtranews #mumbai #newsupdate #maharashtra

संजय राउत ने पुलिस कार्रवाई पर सवाल उठाए #maharashtranews #delhi  #vidarbhanews #nagpurnews #nagpur

संजय राउत ने पुलिस कार्रवाई पर सवाल उठाए #maharashtranews #delhi #vidarbhanews #nagpurnews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges