छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट पुन्हा एकत्र यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आणि संघटना अधिक मजबूत व्हाव्यात, हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘ऑपरेशन टायगर’ संदर्भात प्रतिक्रिया देताना संबंधित खासदारांनी आपला निर्णय विचारपूर्वक घेतला असावा, असे बच्चू कडू म्हणाले. मात्र, पक्षांतील फोडाफोडीसाठी केवळ पक्ष सोडणाऱ्या नेत्यांनाच जबाबदार धरणे योग्य नसून नेतृत्वानेही आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींशी अधिक संवाद साधायला हवा होता, असे मत व्यक्त करत कडू यांनी संघटनात्मक संवादाच्या अभावामुळे अनेक राजकीय घडामोडी घडल्याचे सूचित केले. दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास त्यात काहीही गैर नसून महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ते सकारात्मक ठरू शकते, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी न्यायालयीन निकाल, शेतकरी कर्जमाफी आणि आगामी राजकीय परिस्थितीवरही भाष्य करत राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर आपली भूमिका मांडली. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
स्कॉर्पियो में किडनैप... 7 किलोमीटर दूर ले जाकर थर्ड डिग्री... #nagpurnews #crime...
छात्र मुद्दे पर Youth Congress का प्रदर्शन | 'Amit Shah Jawab Do'...
हर घर तिरंगा अभियान का भव्य आगाज; शहर में वितरित होंगे 1.75...
40 लाख की प्लॉट ठगी का नया केस दर्ज, सक्करदरा पुलिस करेगी...
2009 सीडी मामले में उद्धव ठाकरे का बयान #MaharashtraNews #UddhavThackeray #ShivSena #Political
बिना दस्तावेज मध्य प्रदेश की बस जब्त #MaharashtraNews #STBus #RTO #BusChecking #MPBus...





