
भाजप नेते बाल्या बोरकर यांनी थेट पोलिसांवरच गंभीर आरोप करताना सांगितले की, “ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील व्यापाऱ्यांकडून पोलिसांकडून हप्तेखोरी केली जाते. मादक पदार्थांचा धंदा बिनधास्त सुरू आहे आणि पोलिस यंत्रणा मूग गिळून बसली आहे.
या आंदोलनादरम्यान त्यांनी DCP यांना निवेदन देत पोलिसांच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “गृहमंत्री फडणवीस यांच्याच शहरात जर पोलिसांचा वचक राहिला नसेल तर राज्यात काय परिस्थिती असेल?” असा सवाल करत त्यांनी पोलिस प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी केली.
कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला आणि ड्रग्जच्या वाढत्या साखळीद्वारे युवकांचं भवितव्य उद्ध्वस्त होत असल्याचे सांगत पोलिस दलाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध केला.
मुख्य मुद्दे:
–पूर्व नागपुरात गांजा व ड्रग्ज विक्रीचे प्रकरण
-पोलिसांकडून हप्तेखोरीचे आरोप
-भाजप नेतेच गृहमंत्र्यांच्या विभागाविरोधात रस्त्यावर-DCP कार्यालयात निवेदन सादर
दरम्यान सध्या या आंदोलनामुळे नागपुरातील पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.