
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या कथित नाराजीच्या चर्चांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेने जोर धरताच भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.
“भाजपचा ‘ऑपरेशन टायगर’शी काहीही संबंध नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी आधी स्वतःच्या पक्षात काय सुरू आहे, हे पाहावे. आमदार, खासदार आणि पदाधिकारी पक्ष सोडून का जात आहेत, याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील सहा खासदार दिल्लीत सक्रिय असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा असताना भाजपने मात्र यापासून हात झटकले आहेत. उलट या घडामोडींमागे ठाकरे गटातील अंतर्गत अस्वस्थताच कारणीभूत असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.
संजय राऊत यांनी खासदारांना १५ कोटी रुपयांचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यावरही बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “पुरावा नसताना रोज सकाळी उठून आरोप करणे हा काही राजकारणाचा विषय नाही. पक्षात सुरू असलेली गळती रोखण्यात अपयशी ठरलेले नेते आता भाजपवर आरोप करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्णपणे स्थिर असून महाराष्ट्राला मजबूत नेतृत्व मिळाले आहे, असे सांगत बावनकुळे यांनी विरोधकांच्या सर्व दाव्यांना फेटाळून लावले.
एकीकडे ठाकरे गटातील खासदारांच्या हालचाली आणि दुसरीकडे भाजपची आक्रमक भूमिका यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ ही केवळ राजकीय अफवा आहे की नव्या राजकीय भूकंपाची नांदी, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
Why Are Cows Sitting on Nagpur Roads During Monsoon? | Real Reason...
₹28,325 Crore Hidden Debt? CAG Report on Maharashtra Explained in 60 Seconds
खापा में तेज रफ्तार ट्रक पलटा, दो घायल... #nagpurnews #Khapa #RoadAccident #TruckAccident...
नागपुर सेंट्रल जेल में 'गले मिलन' की अनोखी पहल... #NagpurNews #humanity #Emotional...
पासवर्ड से खोला लॉकर, 40 हजार लेकर फरार! #NagpurNews #crime #Theft #CCTV...




