नागपूर :भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या यशस्वी ११ वर्षांच्या कारभारानंतर, भारत आता “अमृतकाल”च्या दिशेने गतिमान आहे. या कालखंडात देशाने विकासाच्या प्रत्येक पायरीवर झेप घेतली असून, गरिबी निर्मूलन, सामाजिक न्याय, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
२०१४ ते २०२५ या काळात २६ कोटींहून अधिक नागरिकांना गरिबीच्या रेषेतून वर काढण्यात आले आहे. स्वच्छता, पेयजल, घरकुल, आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गरजांवर सरकारने भर देत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा पोहोचवल्या. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, युवकांच्या संधीसाठी, वंचित घटकांच्या उत्थानासाठी धोरणात्मक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, नागपूर महानगर तर्फे “विकसित भारताचा अमृतकाल : सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचे ११ वर्ष बेमिसाल” या अभियानांतर्गत नागपूर शहरात विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाची माहिती देण्यासाठी आज एक पत्रकार परिषद घेण्यात आली.यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित होते.
प्रमुख उपक्रम पुढीलप्रमाणे :
- शुभारंभ पत्रकार परिषद:
दिनांक १२ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजता सेंटर पॉईंट हॉटेल, रामदासपेठ येथे केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या पत्रकार परिषदेने या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. - १००० जनसंवाद सभा:
नागपूर महानगरातील ६ विधानसभा क्षेत्रांतील २० मंडळांमध्ये प्रत्येकी १० सभांचे आयोजन. नागरिकांपर्यंत ११ वर्षांच्या कामगिरीची माहिती पोहचवण्याचा उद्देश. - २० भव्य संकल्प सभांचे आयोजन:
केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांपुढे मांडण्यासाठी संकल्प-सिद्धी सभांचे आयोजन. - विधिज्ञ परिषद:
विधी क्षेत्रातील अभिवक्त्यांसोबत केंद्र व राज्य सरकारच्या न्यायिक सुधारांवर चर्चा. - अर्थतज्ज्ञ परिषद:
चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी आणि फायनान्स तज्ज्ञांसोबत आर्थिक धोरणांवर चर्चा सत्र. - शिक्षक परिषद:
शैक्षणिक क्षेत्रातील धोरण सुधारांवर शिक्षकांशी संवाद. - युवक उद्योजक परिषद:
३५ वर्षांखालील स्वावलंबी, नवोन्मेषी युवकांचा गौरव व संवाद. - डिजिटल मीडियावर स्पर्धा:
रील्स, ब्लॉग्स, लघुचित्रफीती यांची स्पर्धा आयोजित. स्पर्धेत सहभागासाठी नावनोंदणी १२ जूनपासून सुरू, अंतिम मुदत २४ जून. - चित्रप्रदर्शने:
केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या कामगिरीवर आधारित प्रदर्शन, सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये. - कल्याणकारी योजनांची शिबिरे:
नागपूरमधील २० मंडळांमध्ये शासन योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे शिबिरे. - सोशल मीडिया पॅनल चर्चासत्र:
विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाद्वारे चर्चासत्र. - चौपाळ संवाद:
मॉल्स, चौक, उद्यानांमध्ये नागरिकांशी संवाद व जनजागृती. - विशेष संवाद सत्र:
२१ जून रोजी सुरेश भट सभागृहात डॉ. उदय निरगुडकर यांच्या उपस्थितीत मा. नितीन गडकरी यांच्यासोबत थेट संवाद. - घर चलो अभियान:
केंद्र, राज्य सरकार व महापालिकेच्या लोकहितकारी निर्णयांवर आधारित माहितीपत्रकांचे वितरण.
दरम्यान या विविध उपक्रमांद्वारे नागपूर शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत केंद्र सरकारच्या यशस्वी कार्यकाळाची माहिती पोहोचवण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने घेतला आहे.ही अमृतकालाची यात्रा केवळ विकासाची नाही, तर आत्मविश्वासाने परिपूर्ण नव्या भारताच्या उभारणीची आहे.