Published On : Tue, Oct 23rd, 2018

राज्यातील सर्व पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर करणार – बबनराव लोणीकर

Advertisement

मुंबई: राज्यातील सर्व पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर करणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आज दिली.

नागपूर व भंडारा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक आज मंत्रालयात झाली त्यावेळी श्री. लोणीकर व श्री. बावनकुळे बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी.वेलरासू व ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. लोणीकर म्हणाले, नागपूर व भंडारा जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषदअंतर्गत सर्व पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्यात येणार आहेत. या योजनांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. ज्या योजनांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रलंबित आहेत त्या तात्काळ देण्यात येतील. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत सर्व योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील.

यावेळी श्री. बावनकुळे म्हणाले, नागपूर व भंडारा जिल्ह्यातील ज्या पाणीपुरवठा योजना विद्युत पुरवठ्याअभावी बंद असतील त्या तात्काळ सुरु करण्यात येतील. तसेच राज्यातील सर्व पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर करण्याबाबत लवकरच कार्यवाही सुरु करण्यात येईल.