
राहुल माकणीकर
पोलीस उपायुक्त
(गुन्हे)
26 जून हा दिवस जगभर ‘आमली पदार्थ विरोधी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.शासनाने लोककल्याणकारी भूमिका पार पाडण्याच्या उद्देशाने ;हा दिवस साजरा करण्याचेआवाहन केले आणि त्याला तितक्याच औचित्यने प्रतिसाद देत माननीय पोलीस आयुक्त नागपूर यांनी, संवेदनशील समजशील जबाबदार लोकसेवक या नात्याने “ऑपरेशन थंडर “हीआमली पदार्थ विरुद्ध राज्यात प्रथमच अभिनव योजना अखली व नागपूर शहर हे अमली पदार्थ मुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे. ज्यांचा श्वास एखाद्या ध्यासात मिसळून जातो, त्यांचे जिणे मुख्यतः आणि तत्वतः त्यासाठीच असते त्यापैकीच नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल सर एक होत. त्यांच्या संकल्पनेतून 20 जून ते 26 जून आमली पदार्थ विरोधी आठवडा साजरा करण्यात येत आहे.
समाजात दुर्जन सक्रिय झाले आणि सज्जन निष्क्रिय झाले की विचारांपेक्षा विकार अधिक प्रभावी होतात आणि सामाजिक न्यायासाठी, हक्कांसाठी, समाज सुधारणेसाठी, समाज स्वास्थ्यासाठी प्रयत्नपूर्वक कित्येक वर्ष केलेल्या कामाला मुठ माती मिळते . अशीच परिस्थिती अमली पदार्थाच्या सेवनामुळे समाजातील तरुण पिढीची झालेली दिसून येते. कधी कुतूहाला पोटी, नैराश्यातून,कधी मित्रांच्या आग्रहास्तव,कधी गळे कापू स्पर्धेचा उपाय म्हणून, कुटुंबाच्या दुर्लक्षामुळे,, आणि अलीकडील काळात अवास्तव दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांतील दृश्यामुळे अशा एक ना अनेक कारणामुळे आजची तरुणाई मादक पदार्थाकडे सहज आकर्षिल्या जातआहे. महाराष्ट्रातील मोठमोठ्या महानगरपालिका आणि शहरे आणि त्यात खोलवर रुजत गेलेली पब आणि बार संस्कृती ही तरुणांची तीर्थस्थळ झाली आहेत. तेच लोन गाव खेड्यापर्यंत आणि वस्त्या तांड्यापर्यंत हळूहळू पसरू लागले आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी च्या वास्तव्याने पावन झालेल्या तुळजापुरातही आता ड्रग्स मिळाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून आपण वाचल्या. हे राम म्हणणाऱ्या गांधीजी ऐवजी हराम झालेले व्यवस्थेचे भस्मासुर हे नवे आदर्श निर्माण होत आहेत.अशावेळी प्रतिगामी शक्तीच्या छाताडावर थयथया नाचणारी पिढी निर्माण करावयाची असल्यास पुन्हा एकदा गतवैभवाकडे जायचं असेल तर तरुणांना या देशात ज्यांनी जन्म घेतला,स्वतः समुद्रा पार आपला नावलौकिक निर्माण केला आणि तरीही आयुष्यभर निर्व्यसनी राहिले राहिले अशा समाज धुरिणांचा इतिहास पुन्हा पुन्हा त्यांच्यासमोर आणणे ही आपल्या सगळ्या लोकसेवक लोकप्रतिनिधी, समाज सुधारक व समाजाबद्दल ज्यांना आपुलकी आणि आस्था आहे आहे त्या सर्वांची जबाबदारी आहे
स्वामी विवेकानंद असं म्हणतात की “तारुण्य हे ज्वलंत धामन्यातील अविरत स्पंदन आहे. तारुण्याच्या नाडीवरच राष्ट्राच्या हृदयाचे ठोके वाजत असतात.” तारुण्याची व्याख्या करताना विवेकानंद पुढे म्हणतात तरुण कोणाला म्हणायचं,”तर पोलादी खांदा, मजबूत बांधा,अंगात रग आणि बुद्धीत धग ज्याच्या आहे त्याला तरुण असं म्हणावं.ज्याच्या नसनसात राष्ट्रआणि समाज उद्धार याची जाणीव आणि त्यासाठी कृती करण्याची इच्छा व तयारीआहे त्याला तरुण म्हणावं.तरुणांचा विचार एकदा खालावला की विकार बळवतात.विकार बळावले की विकृती निर्माण होते.
विकृतीतून अट्टाहास जन्म घेतो आणि अशा निराशातूनच अतिरेकी स्वातंत्र्याची भावना निर्माण होते. अशा मानसिक परिस्थितीत तरुण अविचारी आणि अतिशय टोकाच्या विचारापर्यंत जाऊ शकतात “त्यातच अमली पदार्थाची साथ असेल तर अधिकच घातक परिस्थिती निर्माण होते या देशातील काही राज्यांना त्याची झळ सोसावी लागली आहे आणि किंमतही मोजावी लागली आहे .अशावेळी त्या दुरावस्थेला आपण सर्व सज्जन असणारा निष्क्रिय समाज
जबाबदार असतो.म्हणून हीच ती योग्य वेळ समजून एकजुटीने आपल्या सर्वांना याचा सामना करावा लागेल.
सद्यस्थितीत भारत हा सगळ्यात जगातला तरुण देश आहे नुकताच जागतिक अर्थव्यवस्थेत आपण चौथे स्थान प्राप्त केले आहे अशावेळी अधिक जोमाने प्रगती करण्याच्या दृष्टीने तरुण सजग कर्तृत्ववान आणि कृतिशील आणि उत्पादन प्रक्रियेत अग्रगण्य असणं ही पहिली व महत्त्वाची पायरी आहे. भोगप्रवणतेचा भस्मासुर चैन आणि चंगळ या कल्पनाने चिंब झालेली दुबळी म्हणे हीच व्यसनाची आणि मादक द्रव्यांना आकर्षित करणारी खरी कारणे दिसून येतात. सधन कुटुंबातील मुलांची स्वायत्तता आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांची स्वतंत्रता याचा विस्मयकारक समागम दोघांनाही व्यसनाच्या गर्दीत लोटतो आहे पालकांनी मुलांना उदंड स्वातंत्र्य द्यावे पण पैसा आणि वेळ यांच्या त्याच्याकडून होणारा विनियोग होतो कसा याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
मादक द्रव्याच्या व्यापाराची साखळी आणि वाहतूक यावर नियंत्रण त्याचबरोबर छापे मारून ते कमी करण्याचे कायम प्रयत्न पोलीस यंत्रणे कडून चालू आहेत परंतु जोपर्यंत लोकसहभागाची याला जोड मिळणार नाही हे कार्य पूर्णत्वास जाईल याची शाश्वती देता येत नाही.
कुटुंब शाळा,महाविद्यालय या मधून अनौपचारिक आणि औपचारिक दोन्ही पद्धतीने जनजागृती व्यापक स्तरावर होणे गरजेचे आहे. व्यसनमुक्ती जवळ जाण्याचा मूलगामी मंत्रच व्यसनभक्ती पासून दूर राहणे होय.हे बाळकडू कुटुंबापासून ते महाविद्यालयापर्यंत प्रत्येक मुलाच्या अंतकरणात खोलवर रुजले गेले पाहिजे. याचबरोबर जे व्यसनग्रस्त आहेत त्यांच्यासाठी मुक्तांगण सारख्या स्वयंसेवी संस्था अतिशय जबाबदारीने हे असिधाराव्रत घेऊन काम करत आहेत. वैयक्तिक पातळीवर, सामाजिक पातळीवर अशा विविध स्तरांवरती हा व्यसनमुक्तीचा जागर सातत्याने चालू राहिल्यास सुदृढ समाज निर्माण होण्यास अतिशय अनुकूल परिस्थिती निर्माण होईल त्या दिशेने “ऑपरेशन थंडर “हे एक चिमुकले जरी असेल तरी सकारात्मक, खंबीर पण आश्वासक पाऊल आहे.आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे की आपण या राष्ट्र उत्थानाच्या कार्यात सर्वांगाने आमच्या सोबत असाल एक कवितेच्या चार ओळी यातून मला आठवतात कोशिश कर ,
हल निकलेगा आज नहीं तो,
कल निकलेगा।
अर्जुन के तीर सा सध,
मरुस्थल से भी जल निकलेगा।
मेहनत कर , पौधों को पानी दे,
बंजर जमीन से भी फल निकलेगा।
ताकत जुटा, हिम्मत को आग दे,
फौलाद का भी बल निकलेगा।
जिंदा रख, दिल में उम्मीदों को,
गरल के समंदर से भी गंगाजल निकलेगा।
कोशिशें जारी रख कुछ कर गुजरने की,
जो हैं आज थमा थमा सा, चल निकलेगा।
जय हिंद
राहुल माकणीकर
पोलीस उपायुक्त
(गुन्हे)