Published On : Wed, Nov 29th, 2023

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री दुसऱ्यांच्या प्रचारात व्यस्त ; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Advertisement

मुंबई : राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठी पीक हानी झाली. या सर्व घडामोडीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणात दुसऱ्या पक्षाचा प्रचार करीत आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुंबईत प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे प्रदूषणाचा स्थर वाढला आहे. स्वत:चे राज्य न सांभाळणारे मुख्यमंत्री तेलंगणातील प्रचारात व्यस्त आहे. त्यामुळे सरकारने राज्य वाऱ्यावर सोडले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वी जमा न झाल्यास दिवाळी साजरी करणार नाही, असे आश्वासन देणारे कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी अद्यापही ते पूर्ण केले नाही.

Advertisement

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यास गरीब शेतकऱ्याचा मुलगा म्हणून गळा काढला जातो. अशा गरीब शेतकऱ्यांचे पंचतारांकित वैभव राज्यातील प्रत्येक छोट्या शेतकऱ्याला लाभो, असा टोला ठाकरे यांनी लगावला. निवडणुका आल्यावर तिजोरी खुली करणारे भाजप नेते राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीवर मदतीचा हात कधी फिरवणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, असेही ठाकरे म्हणाले.