
नागपूर : शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा, हक्क आणि सार्वजनिक निधीच्या वापराबाबत वंचित बहुजन आघाडीने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर गंभीर टीका केली आहे. दक्षिण विधानसभा प्रमुख विजय पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून शासन, प्रशासन आणि नगरसेवकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
विजय पाटील यांनी म्हटले की, शहरातील अनेक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना शासन आणि प्रशासन कोमात असल्यासारखे दिसत आहे. नागरिक आपल्या दैनंदिन विवंचनांमध्ये अडकलेले असून त्यांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नगरसेवक तसेच काही नागरिकही आंधळे, बहिरे आणि मुके झाल्यासारखे वागत असल्याचे चित्र दिसत असल्याची टीका त्यांनी केली.
लोकशाही व्यवस्थेसाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगत पाटील यांनी नागरिकांच्या करातून जमा होणाऱ्या पैशाचा योग्य, पारदर्शक आणि जनहिताचा वापर व्हावा, अशी मागणी केली. प्रत्येक नागरिकाला आवश्यक मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने संघर्ष करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे, त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे आणि न्यायासाठी लढा देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगत, हा लढा भविष्यातही प्रामाणिकपणे सुरू ठेवणार असल्याचा निर्धार विजय पाटील यांनी व्यक्त केला.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
तलाक के बाद शादी से मुकरा प्रेमी.. #nagpurnews #crime #latestnews
भरतवाड़ा में युवक की चाकू गोदकर हत्या.. #nagpurnews #crime #murdernews
महाविकास आघाड़ी ने भाजपा पर साधा निशाना #nagpurnews #MVA #Congress #PoliticalNews
रवि भवन के सामने ओला ड्राइवर का शव बरामद.. #nagpurnews #oladriver #death
सरेआम चाकू की नोक पर डिलीवरी बॉय से लूट.. #nagpurnews #crime #newsupdate







