
नागपूर – सोमवारी रात्री नागपूरमध्ये काही पेट्रोल पंपांवर ईंधन उपलब्ध नसल्याच्या अफवांमुळे शहरात खळबळ उडाली. यामुळे अनेक पंप तात्पुरते बंद झाले आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. लोक मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यासाठी रांगा लावू लागले.
परंतु नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी स्पष्ट केले की, “नागपूरमध्ये पुरेसे ईंधन उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून रांगा लावण्याची गरज नाही.”
जिल्हाधिकाऱ्याने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आणि पेट्रोल पंपांवर ईंधन पुरवठा सुरळीत सुरु असल्याची माहिती दिली.
प्रशासनाने नागरिकांना विनंती केली की, धीर धरा आणि अफवांमुळे घाबरून खरेदी करणे टाळा.
Advertisement









