Published On : Sat, Aug 9th, 2025
By Nagpur Today Nagpur News

विधानसभा निवडणुकीदरम्यान १६० जागा जिंकण्याची हमी देणारे भेटले; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Advertisement

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीतील गैरप्रकारांवर केलेल्या गंभीर आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाम पाठिंबा दर्शवला आहे. शनिवारी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी सांगितले की, राहुल गांधींच्या मांडणीमध्ये तथ्य असून, निवडणूक आयोगाने सखोल आणि पारदर्शक तपास करून सत्य देशासमोर आणले पाहिजे.

पवारांनी उघड केले की, विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच दिल्लीमध्ये काही व्यक्ती त्यांना भेटायला आले होते. “त्या लोकांनी मला सांगितले की, महाराष्ट्रातील २८८ पैकी १६० जागा आम्ही जिंकण्याची हमी देतो. त्यावेळी मी त्यांच्या बोलण्याकडे गांभीर्याने पाहिले नाही, पण नंतर त्यांची आणि राहुल गांधींची भेट घडवून आणली. राहुल गांधींनी काल दिलेली पत्रकार परिषद ही अभ्यासपूर्ण आणि तथ्याधारित होती,” असे ते म्हणाले.

Gold Rate
05 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,35,600/-
Gold 22 KT ₹ 1,26,100 /-
Silver/Kg ₹ 2,36,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राहुल गांधींनी खोट्या मतदानाच्या अनेक उदाहरणांसह पुरावे सादर केले असतानाही, आयोगाने त्यांच्याकडून हलफनामा मागणे चुकीचे असल्याचे पवारांनी नमूद केले. “राहुल गांधी आधीच खासदार म्हणून शपथ घेतलेले आहेत, त्यामुळे हलफनामा मागण्याचा प्रश्नच येत नाही,” असे ते म्हणाले.

“दूध का दूध, पाणी का पाणी झाले पाहिजे. लोकशाही प्रक्रियेवर जनतेचा विश्वास टिकून राहावा यासाठी आयोगाने तातडीने चौकशी करून सत्य स्पष्ट केले पाहिजे,” असा ठाम आग्रह पवारांनी धरला. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, नाराजी मुख्यमंत्र्यांशी नसून निवडणूक आयोगाशी आहे. जर माहिती चुकीची असेल तर आयोगाने देशाला सत्य सांगावे, असेही पवारांनी आवर्जून सांगितले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement