Published On : Tue, Oct 24th, 2017

शंकरपुर राष्ट्रीय जलपेय पुरवठा वाहनीचे युवक कॉंग्रेस द्वारा उद्घाटन

Advertisement

नागपुर: तत्कालीन केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी शंकरपुर जलशुध्दीकरण बेसा-बेलतरोड़ी सह दहा गावांना पाणी मिळण्यासाठी २३२ कोटीचा प्रकल्प आणून तिथल्या नागरिकांना पाणी मिळण्यासाठी मंजूर करविले कॉंग्रेसच्या रजवटीतच हा प्रकल्प पूर्ण झाला.त्या करीता पाटबंधारे राजयमंत्री राजेंद्र मुळक यांनी सतत पाठपूरवठा केला व कॉंग्रेसच्या या २ नेत्यांच्या प्रयत्नामुळे हे जलसुद्धीकरण केंद्र सज्ज झाले.तत्कालीन राज्य सरकारचे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत २३२ कोटिला मंजूरी दिली होती या निधीतून ४७-५० दक्षलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम तयार झाले आहे.

या योजनेत शंकरपुर,बेलतरोड़ी,बेसा,घोगली,पिपळा,हुडकेश्वर,खरबी,बहादुरा,कापसी या एकूण १० गावांचा समावेश आहे. या भागातील पाणी समस्या इतकी भीषण होती की पाण्याअभावी सर्वाना विहिरिच्या खाऱ्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते.पण कॉंग्रेसच्या प्रयत्नामुळे ही समस्या सोडविली गेली.शंकरपुर येथील जलशुद्धीकरण केंद्र व पाण्याची टाकी तयार झाली असूनही हे भाजप सरकार पाणी पुरवठा सुरु करत नाही कारण त्यांना ऐन निवडणुकीच्या वेळेस श्रेय लाटण्याचे आहे.कॉंग्रेसच्या राजवटित मंजूर झालेली विकासकामाचे श्रेय लाटण्याचे काम भाजपा करत आहे व कॉंग्रेसच्या कार्य काळातीलच विकासकामे सुरु आहे,आताच्या सरकारने कुठल्याही नविन योजना आणल्या नाही फक्त योजनेचे नाव बदलून आम्ही केले असे दर्शवितात भाजप सरकार नुसत्या घोषणा करतात विकास मात्र शून्य आहे.

त्या करता नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेस व गावकऱ्यांना सोबत घेऊन पाण्याच्या टाकी वर तीव्र आंदोलन करुन प्रचंड घोषणा बाजीकेली व शंकरपुर राष्ट्रीय जलपेय योजना १० गावांना संजीवनी ठरेल असे म्हटले आहे.युवक कांग्रेस अध्यक्ष नगरसेवक बंटी बाबा शेळके, महासचिव रंजीत बोराडे,महासचिव समीर यादव यांच्या नेतृत्वात पाण्याच्या टाकीचे उदघाटन करण्यात आले तसेच पाण्याच्या टाकीचे रिबिन कांग्रेस कमेटीचे ब्लॉक अध्यक्ष पंकज थोरात,नगरसेवक कमलेश चौधरी,रामटेक लोकसभा युवक कांग्रेसचे अध्यक्ष अनिल राय,कांग्रेस कमिटी महासचिव सदनजी यादव,संघटन सचिव अक्षय समर्थ,बेलतरोड़ीचे माजी उपसरपंच मोहम्मद इस्माइल खान,महिला कांग्रेस प्रदेश सचिव शिल्पाताई बोडखे यांच्या हातून पाण्याचे टाकीचे उदघाटन रिबिन कापून करण्यात आले.

युवक कॉंग्रेस महासचिव रंजीत बोराडे, युवक कॉंग्रेस महासचिव समीर यादव यानी शासनाला चेतावनी दिली की ४८ तासात जर पाणीपुरवठा सुरु केला नाही तर वर्धा रोड वर सगळ्या १० गावच्या गावकऱ्यांना सोबत घेवून रास्ता रोको करण्यात येईल.या आंदोलनात प्रामुख्याने रंजीत बोराडे,समीर यादव,पाशु खान सुभाष वटे,तुषार सुर्यवंशी,प्रणीत मोहोड,राजेंद्र ठाकरे,अक्षय घाटोळे,स्वप्निल ढोके वसीम शेख,शाहबाज़ खान,नईम शेख,पियूष खड्गी,वरुण पुरोहित,हर्षल हजारे,निखिल नंदनवार,हेमंत कातुरे,स्वप्निल बावनकर,पूजक मदने,नितिन सुरुशे,आशीष लोनारकर,सौरभ शेळके,हर्षद धुर्वे उपस्तिथ होते.