
अयोध्या : श्री रामजन्मभूमी मंदिरातील देणगीच्या रकमेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याच्या चर्चांना सरकारी सूत्रांनी फेटाळून लावले आहे. राम मंदिरासाठी जमा झालेल्या सुमारे ३,३०० कोटी रुपयांच्या देणगीचा संपूर्ण हिशोब पारदर्शक आणि अचूक असल्याचा दावा करण्यात आला आहे. ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारात कोणतीही अनियमितता आढळलेली नसून, रोख रक्कम मोजण्याच्या प्रक्रियेदरम्यान काही व्यक्तींनी चोरी केल्याची घटना घडल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
सरकारी माहितीनुसार, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद व्यवस्थित ठेवण्यात आली आहे. या निधीचे स्वतंत्र बाह्य लेखापरीक्षण ‘एम/एस व्ही शंकर अय्यर अँड कंपनी’ यांनी केले असून, देणगीच्या रकमेबाबत कोणतीही आर्थिक तफावत आढळून आलेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रस्टने आतापर्यंत मंदिर उभारणीसाठी सुमारे १,८०० कोटी रुपये, तर जमीन खरेदीसाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्च केले आहेत. हे सर्व व्यवहार बँकिंग प्रणालीद्वारे करण्यात आले असून, त्यामध्ये रोख व्यवहाराचा समावेश नव्हता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर परिसरातील जमिनींच्या किमती वाढल्यामुळे जमीन खरेदीचा खर्च वाढल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, मंदिराच्या दानपेटीत जमा झालेली रोख रक्कम मशीनद्वारे मोजण्यापूर्वी हाताने वर्गीकृत केली जात होती. त्यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाने नियुक्त केलेल्या ‘सैनिक सिक्युरिटी सर्व्हिसेस’ या बाह्य संस्थेतील सहा कर्मचाऱ्यांनी रक्कम चोरल्याचा आरोप आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांचा राम मंदिर ट्रस्ट किंवा मंदिर प्रशासनाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्यात आले असून, या तपासावर सर्वोच्च न्यायालयाचेही लक्ष असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सरकारी सूत्रांनी पुढे सांगितले की, या चोरीच्या घटनेनंतरही भाविकांच्या देणगीत कोणतीही घट झालेली नाही. २०२६-२७ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हुंडीद्वारे दरमहा सरासरी पाच कोटी रुपयांची देणगी जमा झाली आहे. त्यामुळे ही घटना काही व्यक्तींनी केलेल्या चोरीपुरती मर्यादित असून, ट्रस्टच्या आर्थिक कारभाराशी तिचा संबंध जोडणे योग्य ठरणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
KYC के नाम पर ₹7.5 लाख साफ! #NagpurNews #CyberFraud #CyberCrime #OnlineFraud #KYCScam...
मालिक नहीं मिला तो कर्मचारी पर हमला! #NagpurNews #Crime #KnifeAttack #CrimeNews #MaharashtraCrime
मंगलसूत्र और सोने की मणि चोरी के दो मामले उजागर
वर्धा में ग्राम पंचायत कर्मचारियों का जिला परिषद पर मोर्चा #vidarbhanews #wardha...
नाना पटोले का अमित शाह पर तीखा हमला #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha...
रत्नागिरी समुद्र तट पर पर्यटकों की कार फंसी #maharashtranews #ratnagiri #newsupdate #maharashtra




