Published On : Sat, Nov 22nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

शिंदेंना ‘साईडलाइन’ करण्याची प्रक्रिया सुरू? ३५ आमदार भाजपात जाण्याची जोरदार चर्चा

Advertisement

मुंबई — महाराष्ट्राच्या सत्ताकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील मतभेद परत एकदा चव्हाट्यावर आले आहेत. सामना या दैनिकाच्या अग्रलेखात करण्यात आलेल्या भाष्यामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. या अग्रलेखात एकनाथ शिंदेंना बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यांच्या गटातील तब्बल ३५ आमदार भाजपात जाणार असल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे.

अग्रलेखात म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपकडून ‘जागा दाखवण्याचा’ प्रयत्न सुरू आहे. ज्याप्रमाणे शिंदे यांनी शिवसेना फोडून सत्ता मिळवली, त्याच पद्धतीचा आघात आता त्यांच्या स्वतःच्या गटावर होत असल्याचे तीक्ष्ण भाष्य यात करण्यात आले आहे. शिंदे गटाने भाजप मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आमदार पळवण्यासाठी मोठी रक्कम दिल्याची तक्रार केली होती; मात्र या आरोपावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना हसू आवरले नाही, असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. “जे स्वतः बंड करून फुटले, त्यांनी इतरांना फोडण्याची तक्रार करणे हा विनोदच आहे,” असा रोखठोक टोला त्यात आहे.

Gold Rate
21 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,22,500 /-
Gold 22 KT ₹ 1,13,900 /-
Silver/Kg ₹ 1,53,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सत्ताधारी महायुतीतील नाराजीचे नाट्य आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले असल्याचे सामना म्हणते. भाजपला शिंदे आता नकोसे झाले असून, त्यांना कोणतीही किंमत द्यायला भाजप तयार नाही, असे ठामपणे नमूद केले आहे. ठाण्यात भाजपचे गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांनी शिंदे गटाला त्यांच्या मर्यादा दाखवल्याने या मतभेदांना आणखी उधाण आले आहे. शिवाय, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात समन्वय साधला जात नसल्याने तणाव आणखी वाढत असल्याचे मानले जाते.

पुढील विधानसभा निवडणुकांना भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून, ज्या मतदारसंघांत शिंदे गटाचे आमदार आहेत, तिथे भाजप ताकदीची नवी माणसे आणत आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासाठी राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, त्यांच्या गटातील अनेक आमदार भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा तीव्र झाली आहे. सामना अग्रलेखात असा दावा आहे की, शिंदे गटातील किमान ३५ आमदार भाजप प्रवेशासाठी तयार आहेत, आणि यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारणात मोठे उलथापालथ होऊ शकते.

या साऱ्या घटनांमुळे महायुती सरकारमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात नवे वळण दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Advertisement