Published On : Fri, Apr 19th, 2019

ही सुंदर पृथ्वी वाचेल तरच मानवाचे अस्तित्व टिकेल – डाॅ. प्रितम गेडाम

Advertisement

नागपुर: मागच्या दहा हजार वर्षात जेवढे तामपान नाही वाढले तेवढे तापमान आताच्या काही दशकामधेच वाढून गेले आहे. जर असेच चालत राहील तर तो दिवस दूर नाही जेव्हा तुमच्याकडे वाहन राहतील पण ईंधन नाही, मोठी-मोठी काॅक्रीटची घरे असणार पण झाडे नाही, पैसा असणार पण अन्न-धान्य पाणी आक्सीजन नाही, आयुष्य असणार पण स्वस्थ आरोग्य नसणार, कोरळ्या नदी तलाव कालवे विहीर व वने असणार पण त्यात जीवन नसणार आणी ह्याची लक्षणे ही दिसून राहीले आहे म्हणजे सगळीकडे पूर, दुष्काळ, ढगफोडी, त्सुनामी, डोंगर घसरने, विषारी वायु, रेडीऐशनचा धोका, गंभीर आजार, प्रदूषण, अशांती, समाजात समस्याच समस्या दृष्टिगत होणार मग पुढच्या पिढीसाठी आपल्या कडून काय उरणार आहे नंतर पृथ्वीवर मानवाचे अस्तीत्व संपलेच समझा.

आज शहरातून पक्षांची संख्या नाहीसी होत आहे आपल्याला साधारणपणे आपल्या आवारात आता ती सुंदर- सुंदर पक्षी आढळत नाही. पाण्याची पातळीतर ऐवढी खालावली आहे की कित्येक ठिकाणी हजार फुट बोरवेल किंवा विहीर खंदली तरीही पाणी लागतच नाही कारण पावसाचे पाणी जमीनीमधे जिरतच नाही. आपल्या राज्यात आताच कित्येक तालुके दुष्काळग्रस्त घोषीत केले आहेत. पाणी हे जिवन आहे एक दिवस ही आपल्याला पाणी नाही मिळाले तर जनजीवन अस्तव्यस्त होते पण जी मुके जनावरे, पक्षी जंगलात वास्तव्य करतात त्यांची भूक व तहान भागते का याचा कधी आपण विचार करीतो का?. उन्हाळ्यात नदी, तलाव, नहर व इतर पाण्याचे स्त्रोत आटत जातात आणी सगळीकडे पाणीटंचाईची समस्या उद्भवते. मोठ-मोटी वने उजाडत चालली आहे.

औषधीयुक्त वनस्पती व रानटी प्राण्यांची संख्या झपाट्याने घसरत
आहे. जंगलांचे क्षेत्रफळ कमी होत चालले आहे. शेतजमीन सुद्धा कमी होत आहे आणी त्या जमीनीवर कांक्रीटचे जंगल मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणी वाढत्या लोकसंख्येचा गरजा ही खूप वाढल्या आहे पण त्या मानाने निसर्ग व त्याची संपत्ती कमीच होत आहे आणी ह्या नैसर्गीक साधनसंपत्ती ला वेगाने संपविणारे सुद्धा आपणच आहोत.

मागील काही वर्षामधे वातावरणात 100 अरब टनहून जास्त कार्बन सोडण्यात आले ज्यामुळे प्राणवायुची कमी झाली आहे. रासायनीक शेती खूपच घातक आहे भाजीपाला-फळे ही स्वास्थवर्धक राहीली नाही. ग्लोबल वार्मींगमुळे मातीची सुपीकता कमी होत आहे सोबतच शेतीच्या उत्पादकतेवर ही गंभीर परीणाम होत आहे. मानव जीवन उपयोगी सर्व साधन सामग्री निसर्गाचा रूपाने आपल्याला मिळते पण आपण त्याचे महत्व समझूनच घेत नाही आहोत. निसर्ग मानवाची तहान- भूक भागविते, मानवाचे लोभ नाही. निसर्ग सुरक्षित असेल तरच पृथ्वीवर मानवाचे अस्तीत्व टिकून राहणार. एकीकडे किनारपट्टीवर राहणारे लोकांना पूराचा धोका आहे तर दूसरीकडे दूष्काळाचे रूप दिसून येते. लोकांमधे जीवनाच्या आवश्यक गरजेकरीता संघर्ष दिसतो स्वच्छ पाणी सुद्धा मिळत नाही आहे त्यामुळे लोक आपली स्थायी जागा सोडून मोठ्या प्रमाणावर शहरांकडे वाटचाल करीत आहेत.

आजचा युगात आर्थिक असमानता वेगाने वाढत आहे. जगात शिर्ष 300 श्रिमंत लोकांकडे ऐवढा पैसा आहे की जो 30 गरीब देशांहून जास्त आहे. आज आपण कुठेही अन्न खाद्यपदार्थ घेतांना सांगु शकत नाही की ते शुद्ध व भेसळमुक्त असेलच कारण आजकाल प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आणी भेसळच आढळून येते. आज जे आपल्याला प्राणवायु मिळत आहे ते ही विषारी वायुचा स्वरूपात मिळत आहे म्हणजे शुद्ध ऑक्सीजन खूपच कमी प्रमाणात आहे.

प्रदूषण (हवा,जल,ध्वनी,माती), अन्न-धान्यात रासायनिक भेसळ, कोळसा तेल सारख्या खनिजांचा मोठ्या प्रमाणावर उत्खनन, वृक्षतोड, वन्यजिवांची कमी होत चालली आकडेवारी, वाढती लोकसंख्या व त्या लोकसंख्येची वाढती गरज, कचऱ्यात वाढ विशेषकरून विषारी ई-कचरा, आधुनिक जिवनशैली, ईंधनांचा अतीवापर, काॅन्क्रीटचे वाढते जंगल, ग्लोबल वार्मींग, वितळत चालले हिमखंड अश्या सर्वप्रकारची समस्या पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात धोका निर्माण करीत आहे.

जागतिक आरोग्य संगठनेनी जगातली सर्वात प्रदूषित 20 शहरांची क्रमवारी दर्शवली आहे ज्यात भारत देशातील 14 शहरांचा सुद्धा समावेश आहे. श्वास घेतांना मोठ्या प्रमाणावर विषारी वायु शरीरामधे प्रवेश करते. ही खूपच गंभीर बाब आहे की दरवर्षी आपल्या देशात सुमारे 24 लाख लोकसंख्या प्रदूषणामुळे मुत्यूमुखी पडते जे जागतिक स्तरावर मृतकांचा 30 टक्के इतका आहे. प्रदूषणामुळे मानवाची सरासरी वय खूप कमी होत चालली आहे. जगात कित्येक देशात ठंडीत माईनस 70 डिग्री सेल्सीयस तापमान पेक्षा जास्त तर दूसरीकडे उन्हाळ्यात 50 डिग्री पेक्षा जास्त तापमान असते हे सर्व बदल ग्रोबल वार्मींगमुळे घडत आहेत.

आजकाल सगळीकडे विकास, जाती-धर्म व इतर गोष्टि संबंधी नेते बोलतात पण प्रदूषण, वनीकरण, कचरया संबंधी कोणी बोलतांनी दिसत नाही फक्त एक विशेष दिवस साजरा करून सगळे नंतर विसरून जातात जेव्हा की हे जिवनावश्यक गोष्ट आहे. शहरांमधे वाढत्या प्रदूषण व दगदगीचा जिवनाला त्रासून मानव आता तर फार्महाउस सारख्या निसर्गरम्य पर्यावरणीय ठिकाण आरामाचे काही क्षण घालवायला शोधत आहे. साइंस मैगजीनच्या म्हणण्याप्रमाणे मागच्यावर्षी पर्यंत पृथ्वीवर 6.3 बिलीयन टन प्लास्टीकचा कचरा होता जी खूपच गंभीर बाब आहे.

आता समुद्रामधे 150 मिलीयन टन हून जास्त प्लास्टीक कचरा आहे ज्यात प्लास्टीक बोटल जास्त आहेत. एका प्लास्टीक बोटलला बायोडिग्रेड व्हायला चक्क 450 वर्षांचा कालावधी लागतो. जगात दर सेकंदाला 20 हजार पेक्षा जास्त प्लास्टीक बोटल विकल्या जातात. दरवर्षी 60 लाख हेक्टयर पेक्षा जास्त दराने वने कापली जात आहेत ज्यामुळे दरवर्षी 10-12 अरब टन प्राणवायंुची कमतरता होत आहे आणि सोबतच वन्यप्राणी सुद्धा धोक्यात आहेत. रेड डाटा बुकप्रमाणे 400 पक्षी, 138 उभयचर, 305 स्तनधारी जंतु, 193 प्रकारची मासांच्ये अस्तीत्व संपण्याचा मार्गावर आहे.

समाजात कधी कुठेही वाईट बातमी आपल्याला माहिती पडली तर आपण चिंताकरीत बसण्याऐवजी आपणच समाजाप्रती आपले कर्तव्य म्हणून जवाबदारी पार पाळावी म्हणजे कोणाला दोष देवून, स्वताचा मनाचे खच्चीकरण करून, मनस्ताप करून काहीही मिळत नाही तेव्हा स्वतच वैयक्तीक स्तरांवर अवलंबणाचा निर्धार केल्यास खऱ्या अर्थाने हा वसुंधरा दिवस साजरा करता येईल.

पर्यावरणाचे सांभाळ सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. परीवाराप्रमाणे पर्यावरण सुद्धा आपलेच आहे ही भावना सर्वाचा मनात असून त्याचा योग्य साभाळ व्हायलाच हवे.

ग्लोबल वार्मींग यावर एकमात्र उपाय म्हणजे समृद्ध वनीकरण सर्वप्रथम वने समुद्ध व्हायला हवी म्हणजे वृक्षतोडीवर पुर्णपणे नियंत्रण करून वनीकरणावरच लक्ष्य केद्रिंत करणे म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा. वनीकरण समृद्ध म्हणजे पाण्याचे स्त्रोत समृद्ध, शुद्ध प्राणवायु, उत्तम आरोग्य, वने समृद्ध पशु-पक्ष्यांचे व जनावरांचे जीवन समृद्ध, ग्रामिण क्षेत्र समृद्ध, शुद्ध वातावरण, माहागाई नियंत्रित, लोकांचे जीवनमान समृद्ध व सगळीकडे सुंदर समृद्धता आणी तोच असणार मानवाचा खरा विकास. पर्यावरणाचा व निसर्गाचा सांभाळ करणे. संसाधनांचा, विजेचा, पाण्याचा, कागदाचा, ईधनांचा जपून वापर व्हायला हवे.

पर्यावरण संबंधी अधिक सक्तीचे कायदे नियम बनायला हवे. पर्यावरण संबंधी स्पर्धात्मक कार्यक्रम, चर्चा, पोस्टर, नाट्य, स्लोगन, पुस्तक प्रर्दशनी, कार्यशाळा व इतर मार्गाद्वारे समाजात जागृकता निमार्ण करता येईल.प्रसार माध्यमांचा वापर विशेषकरून सोशल मिडीयाचा छान वापर जागृकतेत माहीतीचा प्रसार करण्याकरीता करू शकतो. स्वच्छतेचा निर्धार करणे, सौर उर्जेचा वापर, रेन वाॅटर हार्वेस्टिंग, आधुनिक जिवनशैलीमधे बदल घडविणे. येण्या-जाण्याकरीता शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, सायकल वापरावी व एकाच ठिकाणी जायचे असल्यास खाजगी वाहन शेयरिंग करून चालवावे.

युज एंड थ्रो अशा वस्तुंना नाही म्हणा, रिसायकल होणाऱ्या वस्तुंचा वापर करावा. कचऱ्यात कमी आणणे, इलेक्ट्रानिक कचरा व बायोमेडीकल कचरा मानवी आरोग्य आणी पर्यावरणाकरीता खूपच धोक्याचा आहे तेव्हा अशा कचऱ्याची पुर्णपणे योग्य विलेव्हाट व्हायलाच हवी. स्ंपुर्ण राज्यात शासनाने प्लास्टिक बंदी घातली आहे यात आपली ही जवाबदारी आहे की अशा नियमांचे कुठेही उल्लघन होऊ नये व इतर शासकीय नियमांचे सक्तीने पालन व्हायलाच हवे.