Published On : Wed, May 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार उसळला; भाजप आमदाराच्या भावाची हत्या

कोलकाता : पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विविध भागांत हिंसाचाराच्या घटना घडत असून, राजकीय तणाव तीव्र झाला आहे.

राजधानी कोलकाता येथील न्यू टाऊन परिसरात ५ मेच्या मध्यरात्री धक्कादायक घटना घडली. पीयूष कनोडिया या नव्याने निवडून आलेल्या भाजप आमदाराच्या भावाची हत्या करण्यात आली. “आमदार झाल्याचा आनंद साजरा करण्याआधीच मला भावाचा मृतदेह पाहावा लागला,” असे भावनिक वक्तव्य कनोडिया यांनी केले. त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Gold Rate
May 06- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,50,100/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, राज्यभरात राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष वाढला असून, अनेक ठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाल्या. बीरभूम जिल्हा मधील नानूर येथे एका तृणमूल कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, तर इतर भागांतही हाणामारी आणि जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आतापर्यंत विविध घटनांमध्ये किमान चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

हिंसाचाराचा उद्रेक संदेशखाली येथेही पाहायला मिळाला. येथे समाजकंटकांनी थेट पोलीस आणि सुरक्षा दलांवर हल्ला करत गोळीबार केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी हस्तक्षेप केला. पोलिसांनी घटनास्थळावरून हँडबॉम्ब आणि इतर शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.

दरम्यान, भारत निवडणूक आयोग यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत हिंसाचार भडकवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. राज्यात तणावपूर्ण वातावरण कायम असून, सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement