Published On : Tue, Jul 29th, 2025
By Nagpur Today Nagpur News

आता संयमाचा अंत झालाय;मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून मुख्यमंत्र्यांचा इशारा

Advertisement

मुंबई :राज्यातील काही सत्ताधारी मंत्र्यांकडून सातत्याने होत असलेल्या वादग्रस्त विधानांमुळे सरकारची प्रतिमा धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत थेट नाराजी व्यक्त करत सर्व मंत्र्यांना कडक इशारा दिला आहे.

फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आता वादग्रस्त विधानं किंवा कृती अजिबात सहन केली जाणार नाहीत. अशा गोष्टींमुळे सरकारची बदनामी होते आणि विरोधकांना संधी मिळते.” त्यांनी हे देखील नमूद केले की, अशा प्रकारांचा थेट परिणाम आगामी महापालिका निवडणुकांवर होऊ शकतो.

Gold Rate
Feb 23rd, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,59,800 /-
Gold 22 KT ₹ 1,48,600 /-
Silver/Kg ₹ 2,71,700 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सूचित केलं आहे की, ही ‘अखेरची संधी’ आहे. यानंतर अशा प्रकारांकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही, आवश्यक ती कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी सर्व मंत्र्यांना जबाबदारीने आणि संयमाने वागण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

महायुतीच्या मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे सध्या सरकारवर टीकेची झोड उठलेली असताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिस्थिती हाताळण्याची गंभीर भूमिका घेतली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement