
नागपूर : नागपूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असून, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार राजकीय चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांनी प्रचाराची दिशा बदलल्याचा दावा करत, ही लढाई केवळ सत्तेसाठी नसून जनतेच्या प्रश्नांसाठी असल्याचे म्हटले आहे.
अतुल लोंढे यांनी सांगितले की, पूर्वी अशा निवडणुकांकडे ‘पैसा आणि मतांचे समीकरण’ म्हणून पाहिले जात होते. मात्र यावेळी काँग्रेसने विकासाच्या मुद्द्यांवर आणि स्थानिक प्रश्नांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपवर टीका करताना लोंढे म्हणाले की, विरोधकांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसह मैदानात उतरली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांना निधीची कमतरता, पाणीपुरवठा योजना, आरोग्य सुविधा आणि वाढती बेरोजगारी यांसारखे मुद्दे त्यांनी उपस्थित केले.
नागपूर शहराच्या विकासावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक वर्षे सत्ता असूनही काही महत्त्वाचे प्रकल्प रखडले असल्याचा आरोप करत त्यांनी कचरा व्यवस्थापन, क्रीडा सुविधा आणि मूलभूत सुविधांकडे लक्ष वेधले.
“विधान परिषद हे केवळ राजकारणाचे व्यासपीठ नसून धोरण ठरवण्याचे सभागृह आहे,” असे सांगत लोंढे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना जनहिताच्या प्रश्नांसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
दरम्यान, नागपूरमधील काही नगरसेवकांनीही अतुल लोंढे यांना समर्थन देत स्थानिक प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी ते सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
दुसरीकडे महायुतीकडूनही विजयाचा दावा केला जात असून, नागपूरची ही निवडणूक प्रतिष्ठेची लढत बनली आहे. निकालानंतर नागपूरच्या राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
"रेशीमबाग से निकले, पातालयंत्री स्वभाव के"
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
निर्मल उज्ज्वल के प्रमोटर के घर पहुंचे जमाकर्ता | "हमारा पैसा वापस...
NagpurCrime : नागपुर में काली बाइक गैंग का आतंक; एक दिन में...
Amravati: दर्यापुर के ज्वेलर्स में हथियारबंद डकैती #Amravati #jewellery #Robbery #Crime #Robbery
Nagpur: Cotton Market की सद्गुरु सेल्स में भीषण आग #Nagpur #NagpurNews #FireAccident...




