Advertisement
नागपूर : आमदार रोहित पवार सोमवारी विधानभवनात येत ६० हजार शिक्षक भरती करण्याची मागणी केली आहे. नको पोकळ घोषणा ६० हजार शिक्षक भरती करा, समूह शाळा दत्तक शाळा म्हणजे सरकारच्या पोकळ खेळ, गरीब विद्यार्थ्यांवर कशाला आणताय वाईट वेळ असा मजकूर लिहीलेले जॅकेटही पवार यांनी घातले होते.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या दोन अधिशनामध्ये शिक्षक भरतीचे आश्वासन दिले.मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. महाराष्ट्रातील हिऱ्यासह मोठमोठे उद्योग गुजरातला हलवले जात आहे. त्यानंतरही हे सरकार झोपेत आहे. सध्याची स्थिती पाहता राज्य सरकार गुजरातच्या दावणीला बांधलेले दिसते, अशा शब्दात रोहित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला.
Advertisement