Published On : Tue, Nov 18th, 2025
By Nagpur Today Nagpur News

दमानियांचे आरोप लिखित येईपर्यंत कारवाई नाही; पार्थ पवार मुदतवाढ प्रकरणी मंत्री बावनकुळेंची स्पष्टोक्ती

Advertisement

मुंबई – पार्थ पवार यांच्या नावाशी संबंधित जमीन खरेदी-विक्री प्रकरणावरून दिलेल्या १४ दिवसांच्या मुदतवाढीबद्दल सुरू असलेल्या चर्चेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष येऊन विराम दिला आहे. हे सर्व कार्यवाहीचं टप्प्याटप्प्याने होणारे नियोजन असून, संबंधित व्यक्तीस नोटीस पाठवताना ठरावीक नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्यानेच ही अतिरिक्त मुदत देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बावनकुळे म्हणाले की, अंजली दमानिया यांनी केलेले गंभीर आरोप सरकारपर्यंत अद्याप अधिकृतरित्या पोहोचलेले नाहीत. “आरोपांचे दस्तऐवज प्राप्त झाल्यावर त्याची सविस्तर चौकशी सुरू होईल आणि त्यानंतरच पुढील निर्णय प्रक्रिया राबवली जाईल,” असे त्यांनी सांगितले.

Gold Rate
18 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,600 /-
Gold 22 KT ₹ 1,13,100 /-
Silver/Kg ₹ 1,52,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुंबई मनपावर महायुतीच्या विजयाचा विश्वास-
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा विषय निघाल्यावर बावनकुळे यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचा दावा केला. “राज्यातील डबल इंजिन शासनाने लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. आगामी निवडणुकीत महायुती एकसंधपणे उतरून बहुमत मिळवेल,” असे ते म्हणाले.

महायुतीतील जागावाटपावर देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, आशिष शेलार आणि अमित साटम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अंतिम चर्चा करत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
मुंबईत ५० टक्क्यांहून अधिक मतदान मिळवून महायुती सत्ता स्थापेल, असा आत्मविश्वासही बावनकुळेंनी व्यक्त केला.

भाजपमधील नाराज अपक्षांवर संवाद सुरू-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप कार्यकर्ते अपक्ष म्हणून उभे राहत असल्याबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले, “आमचे कार्यकर्ते पक्षाशी प्रामाणिक आहेत. काही जणांनी नामांकन भरले असले तरी जिल्हा प्रभारी त्यांना समजावून सांगत आहेत. माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकजण अर्ज मागे घेतील, अशी आमची अपेक्षा आहे.”

निवडणुका आठ वर्षांनी होत असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे आणि त्यामुळेच स्पर्धा तीव्र झाल्याचे ते म्हणाले.

मेळघाटात आरोग्य परिस्थिती सुधारण्याचे उद्दिष्ट-
मेळघाटातील गंभीर आरोग्य परिस्थितीबाबत बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की अलीकडच्या काळात बालमृत्यूचे प्रमाण घटले असून उच्च न्यायालयानेही याची दखल घेतली आहे. मात्र ही स्थिती अंतिम नाही. “आमचे ध्येय मेळघाटात शून्य बालमृत्यू आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा एकत्रितपणे दिवस-रात्र काम करत आहे. पुढील काही महिन्यांत लक्षणीय सुधारणा दिसेल,” असे त्यांनी नमूद केले.

Advertisement
Advertisement