Published On : Fri, Jul 3rd, 2015

नागपूर (सावनेर) : युवक युवातिंच्या आत्महत्येमूळे हदरले सावनेर

Advertisement


पालक वर्ग भयभीत

सावनेर (नागपूर)। सावनेर पोस्टे हद्दीत गेल्या आठोडयाभऱ्यात एका मागे एक युवक युवातिंचे गळफास व विषप्राशन करुण आत्महत्येचे सत्र सुरु झाल्याने पालक वर्गात भीतीचे सावट निर्माण होउन असा प्रसंग आपल्यावर तर ओढावनार नाही ना ची चिंता सताऊ लागली आहे.

पूर्वी 10 वि 12 चे निकाल घोषित होताच जिल्ह्यातून एखाद विध्यार्त्यानी गळफास अथवा इतर सधानानी आपली जीवन लीला संपवल्याची घटना घडल्याचे आहे.परंतु आजच्या या पिढीला जणू काही आपले आयुष्य संपवीन्याचे काहीही सोयरे सूतक नसून ते फ़क्त आणि फ़क्त आपलाच विचार करतात त्याना आपल्या आई वडीलांची काही घेनदेन नाही अशे प्रकार सामान्याची बाब झाली असल्याचे आढळुन येत आहे.आठोडयाचे आठ दिवस पूर्ण होत नाही तर तिन चार युवक युवातिने गळफास व विष प्राशान करून आत्महत्या केल्याची घटना घडल्या त्यात सावनेर येथील आरती निकोसे हिने  दिंनाक 28 जूनला, तर रोशन पोटोडे 29 जूनला व राकेश गुप्ता या युवकाने 3 जुलैला सकाळी 11 वाजता सुमसार गळफास लाउन आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली.

सावनेर पोस्टे हद्दीत घडल असलेल्या युवाकांचा दुर्दैवी आत्महत्येचा घटनेत वाढ होत असल्याने सदर घेटनेचा मागचा मुख्य हेतु शोधून काढने काळाची गरज झाली असून आजचा विद्यार्थी व युवा वर्ग हायटेक सोशल नेटवर्किंग अभ्यासाचा अतिरिक्त भार, कॉलेज विद्यालयातिल आधुनिक वातावरण, परिक्षे मध्ये मिळालेले यश अपयश, साथी सोबती सोबत राहून वाईट विसंगति, याउपर आई वडिलांचे चांगले गुन प्रप्तिचे स्वप्न अश्या अनेक करनांची मिमसा होने गरजेचे झाले आहे.त्यातूनच अशे दुर्दैवी प्रकार समोर येउ शकतात यांना टाळण्याकरिता वेळोवेळी पालक शिक्षक वर्ग व आप्तपरिवारांनी युवकांना उत्साहित केले पाहिजे विद्यार्थ्यानचा कमी जास्त गुण प्रप्तिकरिता तसेच त्याना मिळालेल्या यश अपयाशाला टारगेट न करता त्यांनी घेतलेल्या प्रविन्यालाच त्याचा परिश्रमाचे फळ समजुन समोर तू यापेक्षाही चागले गुण प्राप्ति करू शकतो असा आम्हाला विश्वास आहे.अशी सांत्वना पालकांनी विद्यार्थ्यांना दिली पाहिजे जेणेकरूण मुलांचे समाधान होइल व या प्रकारचा घटनांवर आळा घालता येइल.असे मत पोनि शैलेश सपकाळ यांनी रुत्त पत्राशी बोलतांना व्यक्त केले आहे.
suicide_logo_transparent_by_satanen-d2ytxby