
नागपूर : स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात होत असलेल्या कथित वाढीच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महावितरणने शहरातील २१ ठिकाणी तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन केले. या शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडल्या. तुकडोजी चौक येथील शिबिरात ग्राहकांची विशेष गर्दी पाहायला मिळाली.
शिबिरात आलेल्या अनेक ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज वापरात कोणताही लक्षणीय बदल नसतानाही युनिट आणि वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप केला. मागील वर्षीच्या तुलनेत वापर जवळपास तसाच असताना बिल मात्र दुपटीने वाढल्याचे काही ग्राहकांनी सांगितले. याबाबत यापूर्वी तक्रारी करूनही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
काही महिला ग्राहकांनी घरात एसी नसून केवळ कूलरचा वापर असतानाही हजारो रुपयांची वीजबिले येत असल्याची तक्रार केली. कमी वीज वापर असूनही बिलात कोणतीही घट दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
विशेष म्हणजे, केवळ स्मार्ट मीटरधारकच नव्हे तर पारंपरिक मीटरधारक ग्राहकांनीही जादा वीजबिल आणि मीटरमधील तांत्रिक त्रुटींबाबत तक्रारी नोंदवल्या. काहींनी १५ ते १८ हजार रुपयांपर्यंत वीजबिल आल्याचा दावा करत संताप व्यक्त केला.
दरम्यान, महावितरणकडून तक्रारी स्वीकारल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात समाधानकारक तोडगा निघत नसल्याची भावना अनेक ग्राहकांनी व्यक्त केली. त्यामुळे स्मार्ट मीटर आणि वाढीव वीजबिलाचा प्रश्न नागपुरात अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
गर्लफ्रेंड को घुमाने के लिए बना बाइक चोर, आरोपी गिरफ्तार ...#nagpurnews
सेवानिवृत्त उप जिलाधिकारी के घर में हुई चोरी का खुलासा #NagpurNews #CrimeNews...
गौरक्षण आश्रम के बाहर खड़ी कार का कांच तोड़कर चोरी ...#maharashtranews #vidarbhanews...
इथेनॉल विवाद पर बढ़ा सियासी संग्राम #nagpurnews #ethenol #nitingadkari #bjp #cybercrime #latestnews
स्मार्ट मीटर मुद्दे पर शिवसेना का ज्ञापन ... #maharashtranews #vidarbhanews #nagpurnews #newsupdate




