मनपा स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी तसेच नगरसेवक अमोल श्यामकुळे, ईश्वर ढेंगळे , लक्ष्मीनगर झोन चे उपायुक्त श्री जाधव आणि अग्निशमन प्रमुख श्री बारापात्रे ह्यांची संयुक्त पाहणी
मनपा स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी ह्यांनी ह्या विहिरीला लवकरात लवकर पुनर्जीवन व संवर्धन करण्याचे दिले निर्देश्

नागपूर चे राजे रघुजी भोंसले ज्याचे काळात बांधण्यात आलेली ही विहीर सुमारे ३०० वर्ष जुनी असल्याचे मानले जाते आणि एकेकाळी नियोजनबद्ध जलव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग होती… मात्र आज ही विहीर कचरा, प्लास्टिक आणि शेवाळ्याने तसेच दारू आणि बियर च्या बाटल्या ह्यांनी भरून आपली ऐतिहासिक ओळख गमावत आहे.
या विहिरीच्या परिसरात एक प्राचीन हनुमान मंदिर तसेच श्रीकृष्ण मंदिर आणि हिरवाईने नटलेला संपूर्ण परिसर असल्याने तिचे ऐतिहासिक व पर्यावरणीय महत्त्व अधिक वाढते.
वस्तीपासून काही अंतरावर असूनही येथे दररोज अनेक नागरिक सकाळ , दुपार आणि संध्याकाळी मॉर्निंग तसेच इव्हिनिंग वॉलक साठी येतात.
विशेषतः तरुण येथे पिकनिक, वाढदिवस साजरे करणे तसेच छोटे कार्यक्रम आयोजित करतात. मात्र त्यानंतर कचरा आणि प्लास्टिक विहिरीत व परिसरात टाकल्यामुळे तिची अवस्था अधिकच बिकट होत आहे. ह्या तरुणाई ला विनंती आहे त्यांनी ह्या परिसरात येऊन कार्यक्रम नक्की करावे पण जाताना आपण आणलेल्या पाणी बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या आणि तत्सम वस्तू ह्यांची परत जाताना योग्य विल्हेवात लावावी.
उल्लेखनीय आहे के ह्या
विहिरीची रचना देखील आता धोकादायक होत चालली आहे. तिच्या भिंतींचे अनेक भाग कोसळले असून विहिरीत खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत, ज्या पारंपरिक वास्तुकलेचा महत्त्वाचा भाग आहेत. दगडी बांधकाम आणि रचना पाहता तिची प्राचीनता आणि भोसलेकालीन बांधकामशैली स्पष्ट दिसून येते.

रत्नागिरी में मानसून की दमदार दस्तक.. #MaharashtraNews #barish #mansoon #LatestNews
कॉफी विद कलेक्टर में छात्रों का सम्मान.. #MaharashtraNews #NewsUpdate #LatestNews #news
महायुति की एकजुटता का मिला लाभ.. #MaharashtraNews #PoliticalNews #election
नागपुर में सनसनीखेज हत्या.. #nagpurnews #murdernews #nagpur #news #latestnews
242 मतों से सईद खान की जीत.. #maharashtranews #election #politicsnews #newsupdate
जश्न रोकने पर पुलिस-भाजपा में विवाद.. #maharashtranews #solapurnews #bjp #police #politicsnews








