
नागपूर : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एमएनएलयू)मध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्री विद्यापीठ परिसरात आंदोलन छेडले.
आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील अपुऱ्या सुविधा, कॅम्पसमधील सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, प्लेसमेंट प्रक्रिया, परीक्षा नियम तसेच दैनंदिन सोयी-सुविधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, विद्यापीठ शहरापासून दूर असल्याने त्यांना रोजच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रमुख समस्यांमध्ये रात्री कॅम्पसमध्ये प्रवेशावरील निर्बंध, कॅन्टीनची अपुरी व्यवस्था, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कमतरता, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि परिसरातील अस्वच्छता यांचा समावेश आहे. या सर्व बाबींबाबत अनेक वेळा निवेदने देऊनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
विद्यार्थिनींनीही कॅम्पसमधील सुरक्षा आणि गोपनीयतेसंदर्भातील प्रश्न उपस्थित करत तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेले सुरक्षित आणि सुविधा-संपन्न वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतरही महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी प्रशासनाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एनआईटी कार्यालय में महिला कर्मचारी से छेड़छाड़ का आरोप
भिवंडी में खेत की जमीन पर कब्जे का आरोप
मुंबई आंदोलन पर जरांगे पाटील का बड़ा ऐलान.. #Jarange #MarathaReservation #MumbaiProtest #News
Ratnagiri: लोटे MIDC की बदहाल सड़कों पर पहुंचे Aaditya Thackeray #MaharashtraNews
Mohan Bhagwat के America दौरे पर Sanjay Raut का बड़ा बयान! #SanjayRaut...
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...




