
मुंबई : महाराष्ट्र सरकारने जखमी, अपंग आणि विशेष काळजीची गरज असलेल्या वन्यजीवांच्या उपचार व संवर्धनासाठी ३९.६९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महसूल आणि वन विभागाने याबाबत शासन आदेश जारी केला आहे.
या निधीतून राज्यातील विविध वनक्षेत्रांमध्ये वन्यजीवांच्या उपचार, देखभाल आणि संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. मंजूर निधीपैकी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला ३.५५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.याशिवाय पेंच वनक्षेत्रासाठी २ कोटी, पुणे वन विभागासाठी २.१५ कोटी आणि डहाणू क्षेत्रासाठी २.९९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी निधीचा वापर शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. तसेच वन्यजीव संरक्षणाशी संबंधित कायदे आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
जखमी किंवा उपचाराची गरज असलेल्या वन्यजीवांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबवता याव्यात, यासाठी हा निधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जरांगे की राजघरानों से गजट खोलने की सीधी मांग #maharashtranews #satara #newsupdate...
महामेट्रो की नौकरी का फर्जी वादा; ₹7 लाख ऐंठे! #NagpurNews #Crime #JobFraud...
36 हजार कंपनियों का दावा, सामंत करेंगे जांच #vidarbhanews #chandrapur #newsupdate #vidarbha...
कुडाल में 'हर हर तिरंगा' रैली, उमड़ा जनसैलाब #maharashtranews #sindhudurg #maharashtra #news
फाइलिंग के झटकों से इलाके में पड़ीं बड़ी दरारें #maharashtranews #mumbai #newsupdate...
संजय राऊत के अमित शाह पर गंभीर और बड़े आरोप #maharashtranews #delhi...




