Published On : Wed, Jul 30th, 2025
By Nagpur Today Nagpur News

महायुती सरकारमध्ये समन्वयाचा अभाव; राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा घणाघात

Advertisement

गोंदिया : राज्यातील महायुती सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना देशमुखांनी सरकारमधील समन्वयाचा अभाव, भ्रष्टाचार आणि ‘लाडली बहिण’ योजनेतील अनियमितता यावर सडकून टीका केली.

तीन पक्षांची सरकार पण कोणताच समन्वय नाही-

Gold Rate
02 Aug 2025
Gold 24 KT 99,800 /-
Gold 22 KT 92,800/-
Silver/Kg ₹ - ₹- ₹1,11,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

देशमुख म्हणाले, “राज्यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट अशी तीन पक्षांची सरकार आहे. मात्र या तिघांमध्ये कोणताही समन्वय नाही. त्यामुळे रोज काही ना काही घडतं. मंत्र्यांशी संबंधित चार-पाच दिवसांनी नवीन घोटाळे समोर येतात. सामान्य जनतेचे प्रश्न बाजूला पडले आहेत आणि मीडिया फक्त या घटनांवर चर्चा करत राहतो.”

मंत्र्यांचा मुजोरपणा आणि भ्रष्टाचार उघड-

ते पुढे म्हणाले, शिवसेनेचे काही मंत्री शॉर्ट्स आणि बनियनमध्ये असलेल्या लोकांना घुसे मारतात. काही जण सिगरेट पीत बेडवर बसलेले असतात आणि त्यांच्या बाजूला पैशांनी भरलेली बॅग असते. कुणी रमी का खेळतो? एका आमदाराच्या विश्रांतीगृहातून दोन कोटी रुपये कसे सापडतात? या सगळ्या घटना वारंवार घडत आहेत.

‘लाडली बहिण’ योजनेतील घोळाची टीका-

‘लाडली बहिण’ योजनेवर बोलताना देशमुख म्हणाले, “राज्यात सुमारे ढाई कोटी लाडली बहिणी आहेत. पण या योजनेत १४ ते १५ हजार पुरुषांचे नावं नोंदवली गेली आहेत. आधार कार्ड घेताना लिंग स्पष्ट दिसतं. पण निवडणूक जिंकायची घाई इतकी होती की, जनतेच्या कराच्या पैशाचा वापर केवळ मतांसाठी करण्यात आला. लाडली बहिणींच्या नावावर पुरुषांनाही पैसे वाटले गेले, ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रचार-

गोंदियात आयोजित पत्रकार परिषदेत देशमुखांनी स्पष्ट केलं की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सरकार केवळ लोकप्रियतेसाठी घोषणा करत आहे. मात्र प्रत्यक्षात जनतेचे खरे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत.

Advertisement
Advertisement