Published On : Thu, Mar 1st, 2018

रंगोत्सवानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

Advertisement

मुंबई : राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला होळी तसेच रंगोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

देशात होळी तसेच रंगोत्सव साजरा करण्याची प्रथा हजारो वर्षांपासून सुरु आहे, ही प्रत्येक भारतीय व्यक्तीकरिता अभिमानाची गोष्ट आहे. रंगांच्या या उत्सवातून स्नेहभाव व मैत्रीचे बंध दृढ होऊन सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होते.

या आनंददायी सणानिमित्त मी राज्यातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.